तिथी
|
आश्विन शु २ (१०:१२)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
स्वाती (७:२१)
|
योग
|
प्रीति (२४:२९)
|
करण
|
तैतिल (२३:०९)
|
मुस्लीम मोहरम मासारंभ
मुस्लीम कालगणनेच्या मोहरम
या महिन्याची सुरवात होत आहे.
हिजरी सन १४३७
हा सन मुळचा अरबस्थानातला
आहे. मुसलमानांच्या अंमलापासून तो या देशात आला. मुसलमानी धर्म संस्थापक महंमद
पैगंबर हा १५ जुलै ६२२ रोजी, (श्रावण शुक्ल १ गुरवारी रात्री) मक्केहून मदिनेला
गेला. त्यावेळपासून हा सन सुरु झाला. याला रात्रीपासून सुरवात झाली. याच्या वाराचा
आरंभ संध्याकाळपासून होतो. (उदाहरणार्थ आपल्या गुरुवारच्या संध्याकाळपासून ते
शुक्रवार संध्याकाळपर्यंत मुसलमानी पद्धतीत शुक्रवार असतो.)
शुक्ल पक्षात चंद्र दर्शन
झाल्यानंतरच्या रात्रीपासून नवीन महिन्याला सुरवात होते. म्हणजे यांचे महिने केवळ
चांद्र आहेत. या महिन्यातील दिवसांना पहिला चंद्र, दुसरा चंद्र अशी नवे आहेत.
यांच्या बारा महिन्यांची
नावे अशी:
१)
मोहरम
|
२)
सप्फर
|
३)
राबिलावल
|
४)
रबिलाखर
|
५)
जमादिलावल
|
६)
जमादिलाखर
|
७)
रज्जब
|
८)
साबान
|
९)
रमजान
|
१०) सव्वाल
|
११) जिल्काद
|
१२) जिल्हेज
|
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
दुर्गेची नऊ रुपे
ReplyDelete===============
चंद्रघंटा
-----------
दुर्गेच्या तिसर्या शक्तीचे नाव 'चंद्रघंटा' आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. तसेच संकट निवारणासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'मणिपूर' चक्रात प्रविष्ट होते. चंद्रघंटेच्या कृपेने अलौकीक वस्तुचे दर्शन होते. दिव्य सुगंधाचा अनुभव येतो किंवा विविध प्रकारचा दिव्य आवाज ऐकायला येतो. हे क्षण साधकासाठी अत्यंत सावधान राहण्यासाठी असतात.
देवीचे हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे. तिच्या मस्तकावर घंटेच्या आकराचा अर्धचंद्र असल्यामुळे तीला 'चंद्रघंटा देवी' असे म्हटले जाते. शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे. या देवीला दहा हात आहेत. या दहा हातामध्ये खड्ग, धनुष्यबाण आदी शस्त्रे आहेत. तीचे वाहन सिंह असून मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते.
माँ चंद्राघंटाच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणिसंकट दूर केले जाते. माँ भक्तांच्या संकटाचेनिवारण लगेच करते. तिचा उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो. तिच्या घंटेच्या आवाज प्रेतबाधेपासून भक्तांचे रक्षण करतो. या देवीच्या चरणी शरणागती पत्करल्यास घंटेचा आवाज निनादतो. या माँ देवीचे रूप अत्यंत सौम्य व शांतीपूर्ण आहे. या देवीची आराधना केल्यास वीरता-निर्भयता बरोबर सौम्यतेचा विकास होवून संपूर्ण शरीरात कांती-गुणांची वाढ होते. आवाजात मधुरता येते. माँ चंद्राघंटाचे भक्त आणि उपासक जेथे जातात तेथील लोक त्यांना पाहून शांती आणि सुखाचा अनुभव करतात. आपण आपले मन, वचन, कर्म हे पवित्र करून देवीची उपासना करण्यासाठी तयार व्हा. तिची उपासना केल्यामुळे सर्व संसारीक संकटातुन मुक्ती मिळते. आपण नेहमी तीची उपासना
करण्यासाठी अग्रेसर असावे.