तिथी
|
आश्विन शु ५ (१४:१८)
|
वार
|
रविवार
|
नक्षत्र
|
जेष्ठा (१३:१२)
|
योग
|
शोभन (२३:५६)
|
करण
|
कौलव (२६:३३)
|
पंचरात्रोस्तवारंभ
नवरात्र सुरू
होण्यापूर्वी अशौच आले व महानवमीपूर्वी अशौच संपत असेल तर त्यानंतर सात, पाच,
तीन अथवा एक दिवस जेवढे
दिवस मिळतील तेवढे दिवस नवरात्र करावे. अशौचामुळे वर सांगितल्यामुळे कमी दिवसांचे
नवरात्र करतात. अशा दिवसांचा उल्लेख सप्तरात्रोत्सवारंभ, पंचरात्रोत्सवारंभ, त्रिरात्रोत्सवारंभ अशा प्रकारे केलेला असतो. अशा दिवशी
घटस्थापना करून नवमीपर्यंत नवरात्रीची पूजा करता येते.
बिल्वनिमंत्रण
आश्विन शु.
षष्ठीला प्रात:स्नानादी नित्यकर्मे झाल्यावर देवीची पूजा करावी आणि ज्येष्ठा असेल
तर त्यांच्या पूजेसाठी बिल्ववृक्षाला निमंत्रण करावे.
सरस्वती आवाहन
१३:१२ नंतर सरस्वती आवाहन
करावे.
आश्विन शु.
सप्तमीपासून नवमीपर्यंत सरस्वतींचे शयनव्रत करतात. यासाठी सप्तमीला पुस्तकादिकांचे
पूजन करून सरस्वतीचे शयन करावे. स्वत: व्रतस्थ राहावे. पठण-पाठण, लेखन आदी गोष्टी बंद ठेवाव्या. सप्तमीपासून दशमीपर्यंत
पुस्तकादिकांची पूजा करावी. पूजेसाठी सरस्वतीची सुवर्णाची, पाषाणाची किंवा
चित्रयुक्त मूर्ती असावी. ती चतुर्भुजा, सर्वालंकारमंडित असावी.
तिच्या उजवीकडील दोन हातांत पुस्तक व रुद्राक्षमाला असावी आणि डावीकडील दोन हातांत
वीणा व कमंडलू असावा. अशा विराजमान-शोभायमान-मूर्तीचे ध्यान करावे.
घबाड
१४:१८ नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: चित्रा
चंद्र
नक्षत्र : मूळ
तिथी:
६
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६
x ३ = १८
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे ६ तिथी
मिळवू : १८+६ = २४
आता
७ ने भागू २४ / ७ = ३ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
दुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'आज्ञा' या चक्रात स्थिर होते. योगसाधनेत या आज्ञा चक्राचे विशेष स्थान आहे. या चक्रात स्थिर झालेला साधक कात्यायनीच्या चरणी आपले सर्वस्व वाहून देतो. परिपूर्ण आत्मदान करणार्या भक्ताला देवी सहजपणे दर्शन देते. दुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले यामागे एक कथा आहे.
ReplyDeleteकत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्ष भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला. काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले. महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला कात्यायनी देवी असे नाव पडले. अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता. सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता. अशी ही कथा पुराणात आहे
कात्यायनी अमाप फलदायक आहे. कालिंदीच्या यमुना किनारी भगवान कृष्णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी ब्रज गोपींनी या देवीची पूजा केली होती. ही देवी ब्रजमंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात प्रतिष्ठित आहे. कात्यायनीचे रूप अत्यंत तेजःपुंज आहे. तिला चार भुजा आहेत. देवीचा उजव्या बाजूकडील वरचा हातात अभयमुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे. तिचे वाहन सिंह आहे.
कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या चार फळाची सहजतेने प्राप्ती होते. तो इहलोकात राहूनही त्याला अलौकीक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो. जो व्यक्ती मातेची मनापासून पूजा करतो. तो रोग, भय, दु:ख आणि संतापापासून मुक्त होतो. सात जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला शरण येऊन तिची उपासना करणे आवश्यक आहे.