तिथी
|
भाद्रपद कृ. १३ (२४:१७)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
पूर्वाफाल्गुनी (१९:२४)
|
योग
|
शुक्ल (२०:१७)
|
करण
|
गरज (१०:५७)
|
पितृश्राद्ध
या त्रयोदशीला
पितृश्राद्ध करून पितृगण तृप्त केले तर सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात. जर
त्याला पुत्र असेल तर अपिंडक श्राद्ध करावे.
शनिप्रदोष
सूर्यास्तानंतर
पुढे ३ मुहूर्त (म्हणजे मध्यम मानाने
साधारण २ तास २४ मिनिटे ) प्रदोष काळ असतो.
प्रत्येक
चांद्र मासात प्रदोष काळी जेव्हा त्रयोदशी असेल त्या दिवशी प्रदोष निमित्त उपास
करतात.
‘कामनाभेद ' हा या व्रताचा विशेष
आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला हे व्रत करावे. याप्रमाणे एक
वर्षभर करावे. व्रतादिवशी प्रात: स्नान करुन ' मम पुत्रादिप्राप्तिकामनया प्रदोषव्रतमहं करिष्ये ' इ. संकल्प करून व्रतारंभ करावा. सायंकाळी पुन्हा स्नान करावे. श्रीशंकराचे
पुढे बसून वेदपाठी ब्राह्मणाज्ञेप्रमाणे पुढील मंत्राने प्रार्थना करावी व
षोड्शोपचारे पूजा करावी.
भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥
उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे । ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥
भाजलेले सातूचे पीठ , तूप व साखरेचा नैवेद्य अर्पण
करावा. याप्रमाणे करून तेथेच आठ दिशांना आठ दिवे प्रज्वलित करावेत व प्रत्येक दिवा
लावताना आठ वेळा नमस्कार करावा. ' धर्मस्त्वं वृषरूपेण ' या मंत्राने नंदिकेश्वराला पाणी दुर्वा आदि देऊन त्याची पूजा करावी व त्याला
स्पर्श करुन ' ऋणरोगादि' या पूर्ण मंत्राने शंकर , पार्वती आणि नंदिकेश्वराची
प्रार्थना करावी. हे व्रत विशेषत: स्त्रियांनी करण्याचे आहे. नंदीच्या शेपूट व
शिंगे आदींच्या स्पर्शाने अभीष्टसिद्धी होते.
Ø सोमवार: शांतीरक्षणासाठी सोम प्रदोष करावा.
Ø मंगळवार: ऋणमुक्त होण्यासाठी
भौम प्रदोष करावा.
Ø शुक्रवार: सौभाग्य किंवा
स्त्री-समृद्धीची इच्छा असेल तर शुक्रवारी हे व्रत करावे.
Ø शनिवार: पुत्र प्राप्तीसाठी
शनिप्रदोष वर्षभर किंवा फलप्राप्ती होई पर्यंत करावा.
रविवार: आयुर्दायासाठी अर्कप्रदोष हे व्रत करावे.
युगादि / युगान्तर व्रत
भाद्रपद कृष्ण
त्रयोदशीला कलियुगाचा प्रारंभ झाला, असे म्हणतात.
म्हणून या तिथीला हे व्रत करतात. याचा विधी असा-
अंगाला गोमूत्र, गोमय, दूर्वा व चिकणमाती
लावावी. पाण्याच्या डोहात किंवा तलावात स्नान करावे. या स्नानामुळे गयाश्राद्ध
केल्याचे फळ मिळते. विष्णुमूर्तीला तूप, दूध आणि शुद्धोदक यांनी
स्नान घातल्यास विष्णुलोकाची प्राप्ती होते.
ज्या तिथीला नवीन युगाचा
आरंभ झाला त्या तिथीला युगादी असे म्हणतात. ४ युगांच्या आरंभीच्या ४ तिथी पुढील
प्रमाणे आहेत.
१)
|
कृतयुग
|
कार्तिक शु ९
|
२)
|
त्रेतायुग
|
वैशाख शु ३
|
३)
|
द्वापारयुग
|
माघ कृ अमावास्या
|
४)
|
कलियुग
|
भाद्रपद कृ १३
|
भद्रा
२४:१७ नंतर भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.
विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment