तिथी
|
आश्विन शु १४ (२१:१०)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
रेवती (२६:१३)
|
योग
|
हर्षण (२२:४१)
|
करण
|
गरज (१०:५८)
|
आकाश दीपदान
कोजागिरी पौर्णिमा
आश्विन पौर्णिमेला (निशीथव्यापिनी ) ऎरावतावर आरूढ झालेल्या इंद्राची आणि
महालक्ष्मीची पूजा करावी. उपवास करावा. गंधपुष्पादींनी पूजिलेले व तुपाचे एक लक्ष, पन्नास हजार, दहा हजार, एक हजार किंवा केवळ
शंभर दीप लावून देवमंदिर, बाग- उद्याने, तुलसीवृंदावन अश्वत्थवृक्ष, वस्तीतील रस्ते, चौक, गल्ल्या, घराची छते इ. ठिकाणी ठेवावे. उजाडल्यावर स्नान वगैरे करून पूजा करावी.
ब्राह्मणांना घृतशर्करामिश्रित खीर वाढावी. वस्त्रे, दक्षिणा देऊन सुवर्णाचे दीप दान
करावे. असे केल्याने अनंतफलाची प्राप्ती होते.
रात्री लक्ष्मी व
इंद्रपूजन
या दिवशी रात्री इंद्र आणि लक्ष्मी विचारीत असतात, 'कोण जागे आहे?' उत्तरादाखल त्यांचे
पूजन आणि दीपप्रज्वलन पाहिले म्हणजे त्या देवता प्रसन्न होतात आणि हे व्रत करणारास
लक्ष्मी आणि प्रभुत्व प्राप्त होते.
भद्रा
२१:१०
नंतर भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक
चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
शरत्पूर्णिमा
या व्रतासाठी
प्रदोषव्यापिनी व निशीथव्यापिनी पौर्णिमा घ्यावी. अशी पौर्णिमा पहिल्या दिवशी
निशीथव्यापिनी व दुसर्या दिवशी प्रदोषव्यापिनी असेल तर पहिल्या दिवशी व्रत करावे.
या दिवशी काश्याच्या
भांड्यात तूप घालून ते सुवर्णसहित ब्राह्मणास दान दिले असता ओज प्राप्त होते.
अपराह्ण काळी
हत्तीची आरती केली असता उत्तम फळ मिळते. आणि अन्य प्रकारचे अनुष्ठान केले असता सफल
सिद्धी होते. याखेरीज निशीथव्यापिनी आश्विन पौर्णिमेला सकाळच्या वेळी आराध्य
देवतेला चांगल्या शुभ्र वस्त्रभूषणांनी सुशोभित करून तिची षोडशोपचार पूजा करावी
आणि रात्रीच्या वेळी गाईच्या दुधाची उत्तम खीर बनवून त्यात तूप व खडीसाखर घालावी व
मध्यरात्रीच्या वेळी देवतेला अर्पण करावी. तसेच पूर्णचंद्र मध्याकाशात आल्यावर
त्याची पूजा करावी आणि वर सांगितलेल्या खिरीचा नैवेद्य दाखवावा व दुसर्या दिवशी
ती स्वत: सेवन करावी.
कौमुदी महोत्सव
आश्विन
पौर्णिमेस होणारा प्राचीन लोकोत्सव. वात्स्यायनाने याला कौमुदीजागर व वामन
पुराणाने याला दीपदानजागर म्हटले आहे. बौद्धकालात हा उत्सव साजरा होत असे.
या दिवशी नगरात उत्साहाचे वातावरण पसरे. लोक गावातले
रस्ते स्वच्छ करीत. घरावर ध्वज लावीत. घरेदारे पुष्पमालांनी शृंगारीत. रात्रौ
दीपाराधना करीत. स्त्री-पुरुष रात्रीच्या वेळी वस्त्राभूषणांनी नटून शहरात हिंडत.
जागोजाग नृत्याच्या मैफली चालत. लोक रात्रभर जागरण करीत व जुगारही खेळत. या दिवशी
बलिराजाची पूजा करावी, असे वामन पुराणात सांगितले आहे.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
कोजागरी पौर्णिमा (शरद पौर्णिमा) :
ReplyDeleteकोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो. या दिवशी रात्री लक्ष्मी आणि इंद्र यांची पूजा केली जाते. मध्यरात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जो जागा आहे, त्याला धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते, अशी कथा आहे. या दिवसाचे महत्त्व आणि पूजाविधी या लेखातून समजून घेऊया.
इतिहास :
या दिवशी भगवान श्रीकृष्णाने व्रजमंडळात रासोत्सव साजरा केला, असे श्रीमद्भागवतात म्हटले आहे.
महत्त्व :
वर्षातील या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो. मूळ चंद्रतत्त्वाचे म्हणजे ‘चंद्रमा’चे प्रतिनिधित्व करणारा आणि आपल्याला दिसणारा चंद्र ‘चंद्रमा’प्रमाणेच शीतल आणि आल्हाददायक आहे. साधकांना चंद्रासारखी शीतलता ईश्वराच्या अवतारांपासून अनुभवता येते, म्हणूनच रामचंद्र, कृष्णचंद्र अशीही नावे राम-कृष्णांना दिली गेली. चंद्राच्या या गुणांमुळेच ‘नक्षत्राणामहं शशी’ म्हणजे ‘नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे’, असे भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत (१०:२१) सांगितले आहे.
मध्यरात्री श्री लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर येऊन ‘को जागर्ति’ म्हणजे ‘कोण जागे आहे ?’, असे विचारून जो जागा असेल, त्याला धनधान्याने संतुष्ट करते.
या दिवशी ब्रह्मांडात आदिशक्तीरूपी धारणेतील श्री लक्ष्मीरूपी इच्छाशक्तीची स्पंदने कार्यरत असतात. या दिवशी धनसंचयाविषयी असलेल्या सकाम विचारधारणा पूर्णत्वाला जातात. या धारणेच्या स्पर्शाने स्थूलदेह, तसेच मनोदेह यांची शुद्धी होण्यास साहाय्य होऊन मनाला प्रसन्नधारणा प्राप्त होते. या दिवशी कार्याला विशेष असे धनसंचयात्मक कार्यकारी बल प्राप्त होते.
या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ, म्हणजे कोजागरी पर्वतालगत आलेला असतो. त्यामुळे या पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हटले जाते.
भावार्थ :
कोजागरीच्या रात्री जो जागृत आणि सावध असतो, त्यालाच अमृतप्राशनाचा लाभ मिळतो ! कोजागर · को ± ओज ± आगर. या दिवशी चंद्राच्या किरणांद्वारे सर्वांना आत्मशक्तीरूपी (ओज) आनंद, आत्मानंद, ब्रह्मानंद भरभरून मिळतो; परंतु हे अमृत प्राशन करण्यासाठी ऋषी म्हणतात, ‘को जागर्ति ?, म्हणजे कोण जागृत आहे ? कोण सावध आहे ? कोण याचे माहात्म्य जाणतो ? जो जागृत आणि सावध आहे आणि ज्याला याचे माहात्म्य ठाऊक आहे, त्यालाच या अमृतप्राशनाचा लाभ मिळेल !’ – प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
उत्सव साजरा करण्याची पद्धत :
‘या दिवशी नवान्न (नवीन पिकवलेल्या धान्याने) जेवण करतात. श्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला इंद्र यांची रात्री पूजा करतात. पूजा झाल्यावर पोहे आणि नारळाचे पाणी देव आणि पितर यांना समर्पून नंतर नैवेद्य म्हणून ग्रहण करतात आणि मग आपल्याकडे आलेल्या सर्वांना देतात. शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या स्वच्छ चांदण्यात दूध आटवून चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात आणि नंतर नैवेद्य म्हणून ते दूध ग्रहण करतात. चंद्राच्या प्रकाशात एकप्रकारची आयुर्वेदिक शक्ती आहे. त्यामुळे हे दूध आरोग्यदायी आहे. या रात्री जागरण करतात. करमणुकीसाठी निरनिराळे बैठे खेळ खेळतात. दुसर्या दिवशी सकाळी पूजेचे पारणे करतात.
कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी आणि इंद्र यांचे पूजन करण्याची कारणे:
या दोन देवतांना पृथ्वीवर तत्त्वरूपाने अवतरण्यासाठी चंद्र आग्रहात्मक आवाहन करतो.
लक्ष्मी ही आल्हाददायक आणि इंद्र ही शीतलतादायक देवता आहे. यादिवशी वातावरणात या दोन देवता तत्त्वरूपाने येत असल्याने आणि त्यांचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असल्याने त्यांची पूजा केली जाते.
लक्ष्मी आणि इंद्र यांचा पूजाविधी :
लक्ष्मी आणि इंद्र यांच्या पूजेत पोहे आणि नारळाचे पाणी वापरतात. पोहे हे आनंद देणारे, तर नारळाचे पाणी हे शीतलता प्रदान करणारे आहे. त्यामुळे हे दोन घटक वापरून जीव स्वतःकडे आनंद आणि शीतलता यांच्या लहरी आकर्षित करत असतो.
चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात; कारण या दिवशी दुधात चंद्राचे प्रतिबिंब पाहिल्याने त्यातून प्रक्षेपित होणारे चंद्रतत्त्व आपल्याला मिळते. या दुधात स्थूल आणि सूक्ष्म रूपांतून चंद्राचे रूप अन् तत्त्व आकर्षित झालेले असते.
आश्विन पौर्णिमा यालाच "कोजागिरी पौर्णिमा" म्हणतात.
ReplyDeleteया दिवशी रात्री इंद्राची ,चंद्राची, कुबेराची व लक्ष्मी ची पूजा करतात.
मध्य रात्रि पर्यंत जागरण करतात .
पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दूधाचा नैवेद्य दाखवायचा असतो.
मध्यरात्री लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वी वर उतरते व `को जागर्ति'?
कोण जागं आहे?
जो जागा असेल त्याला जी धनधान्य ,सुख ,आशीर्वाद देते.
यावरून कोजागिरी पौर्णिमा असे नांव पडले.
सर्वानी हा लक्ष्मी सेवेचा कार्यक्रम करावा……
हा उत्सव आश्विन शुध्द पौर्णिमा या दिवशी राञी ठिक १२ ते १२:३९ या ३९ मिमिनिटात करावयाचा असतो.
भगवान इंद्र,लक्ष्मी,कुबेर याची वर्षातुन सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते.
शक्यतो हा उत्सव प्रत्येकाने आपल्या घरीच करावा
पूजा मांडणी
मांडणी करताना एका पाटावर करावी
१) लक्ष्मीचे प्रतिक म्हणून विड्य़ाच्या जोड पानावर सुपारी ठेवावी.
२)अजून विड्याच्या जोडपानावर कुबेराची प्रतिक म्हणून सुपारी ठेवावी.[१ सुपारी(लक्ष्मी),१ सुपारी ( कुबेर)
३)तांदूळाच्या राशीवार पाण्याने भरलेला ताब्याचा भरलेला गडवा त्यावर आंब्याचा डगळा( डगळा जोडलेला हवा,सुटा नको) हे इंद्राचे प्रतिक आहे
४)चंद्राचे प्रतिक म्हणून चंदनाचा भरीव गोल (चंद्र म्हणून) पाटावर काढावा .
पाटावर अशी मांडणी ठिक १२ वाजेपर्यंत करुन ठेवावी. व ठिक १२ ते १२. ३० या ३० मिनिटात दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवावे जेणे करून चंद्र देवता शलाका रुपात अमृताचा प्रसाद देतात.
५) १२:३० ला पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे समोर ठेऊन चारही देवांची हळदी-कुंकू, पांढरी फुले,अक्षता ,अष्टगंध ,वाहून पूजा करावी . दुपारीच तुलसी पत्र तोडून ठेवावी.त्यात एक तुलसी पत्र टाकावे व नेव्यद्य व प्रार्थना म्हणावी .
प्रसाद घरातील व्यक्तींनीच घ्यावा दुसऱ्यांना देऊ नये.पुजेतील सुपाऱ्या जपून ठेवाव्या.त्यातील लक्ष्मीची,कुबेराची सुपारी दिवाळीत लक्ष्मी कुबेर यांच्या पूजनाच्या दिवशी पूजावी.जोपर्यंत या सुपाऱ्या चांगल्या असतील तोपर्यंत दरवर्षी पूजणे.(कीड लागल्यास विसर्जन करावे)
कोजागिरी हे व्रत लक्ष्मी प्राप्तीचे असल्याने या दिवशी किमान करावयाची सेवा.
''लक्ष्मी गायञी जप १ माळ,
''विष्णु गायञी मंञ १ माळ,
''व्यंकटेश स्तोञ,
''श्रीसुक्त १ वेळा वाचावे
''लक्ष्मी कवच १ वेळा वाचावे.
''कुबेर मंञ १ माळ जप करावा.
ज्यांना शक्य असेल त्यांनी
''विष्णू सहस्र नाम ,
''गीतेचे १५ वा अध्याय व
''गीतेची १८ नावे म्हणावीत .
अर्थात लक्ष्मी बरोबर विष्णू ची सेवा करावी . तो पर्यंत जागरण करावे .
कारण या दिवशी भगवान विष्णू व लक्ष्मी पृथ्वीवर आकाश मार्गाने भ्रमर करतात.
व जे जागरण करून सेवा करतात त्यांना आशीर्वाद देतात.