तिथी
|
चैत्र कृष्ण ११ (१४:५८)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
पूर्वाभाद्रपदा (१८:२०)
|
योग
|
ऐंद्र (८:५४), वैधृति (२९:२६)
|
करण
|
कौलव (२५:३१)
|
वरूथिनी एकादशी
चैत्र कृष्ण
एकादशीला 'वरूथिनी एकादशी' म्हणतात. हे
एकादशीचे व्रत केल्याने ऐश्वर्य प्राप्त होते. मांघाता, धुंधुमार इ. अनेक
राजांनी हे व्रत करुन स्वर्ग मिळविला अशी कथा पद्मपुराणात आहे. तसेच , या व्रतामुळे मनुष्य सर्व पापतापातून मुक्त होतो, त्याला अनंत शांती मिळते व उत्त्मलोक प्राप्त होतात.
व्रत करणार्याने
दशमी दिवशी एक वेळ हविष्यान्न घ्यावे. काशाचे भांडे, मांस, मसूरादी पदार्थ वर्ज्य करावेत. नंतर एकादशीस उपवास करावा.
त्या दिवशी द्यूत, झोप आदींचा त्याग करावा. रात्री परमेश्वराचे
नामस्मरण करीत जागरण करावे. द्वादशी दिवशी मांस, कास्यपात्र वगैरे
सोडून पारणे करावे. (खरे तर, द्यूत, मद्यमांस, कासे आदींचा नेहमीच त्याग
करावा)
श्रीवल्लभाचार्य जयंती
भक्तिकालीन
सगुणधारेच्या कृष्णभक्ति शाखेचे आधारस्तंभ आणि पुष्टिमार्गाचे प्रणेता
श्रीवल्लभाचार्य (इ.स. १४७९-१५३१) यांचा जन्म विक्रम संवत् १५३५ च्या कृष्ण
एकादशीला दक्षिण भारतातील कांकरवाड या गावी झाला.
तैलंग ब्राह्मण श्रीलक्ष्मणभट्ट आणि त्यांची पत्नी इलम्मागारू यांचे ते
पुत्र होते. सध्या त्यांचे जन्मस्थान छत्तीसगढ़ मधील रायपुर जवळ चम्पारण्य इथे
आहे. श्रीवल्लभाचार्य यांना वैश्वानरावतार (अग्नि चा अवतार) मानले जाते. ते
वेद्शास्त्रात पारंगत होते. त्यांनी विविध भाषांमध्ये लिहिलेल्या अनेक ग्रंथांपैकी
१६ ग्रंथ हे 'षोडश ग्रन्थ' या नावाने
प्रसिद्ध आहेत.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment