Wednesday, 17 August 2016

दिनविशेष - १८ ऑगस्ट - २०१६




तिथी
 श्रवण शुक्ल १५ (१४:५७)  
वार
 गुरुवार
नक्षत्र
 धनिष्ठा (२३:२२)
योग
 शोभन (१९:५८)
करण
 बालव (२६:०१)

रक्षाबंधन

हे व्रत पौर्णिमेला करतात. या दिवशी परान्ह व्यापिनी तिथी धरतात. जर ती दोन्ही दिवशी असेल अगर दोन्ही दिवशी नसेल तर पूर्वी धरावी. जर त्या दिवशी भद्रा असेल तर ती वर्ज्य करावी. भद्रामध्ये श्रावणी व फाल्गुनी दोन्ही वर्ज्य ठरविल्या आहेत. कारण श्रावणीमुळे राजाचे व फाल्गुनीमुळे प्रजेचे अनहित होते. त्या दिवशी व्रत करणार्‍याने प्रात:स्नानादी नित्यकर्मे करून वेदोक्‍त मंत्राने रक्षाबंधन, पितृतर्पण, आणि ऋषिपूजन करावे. शूद्राने मंत्राशिवाय स्नानदानादी करावे. रक्षेसाठी चित्रविचित्र रंगीत वस्त्र अगर रेशीम वापरावे. त्यात तीळ, सुवर्ण, केशर, चंदन, अक्षता आणी दूर्वा घालून त्याला रंगीत दोरा गुंडाळावा आणि आपल्या घरातील पवित्र जागी (देवघरात) कलश स्थापन करून त्यावर त्याची यथाविधी पूजा करावी. नंतर राजा, मंत्री, वैश्‍य अगर शिष्ट शिष्यांच्या वगैरे उजव्या हातात
'येन बद्धो बलीराजा दानवेन्द्रो महबल: ।
तेन त्वां अनुबध्नामि रक्षे मा चल मा चल ॥'
या मंत्राने बांधावा. या बंधनामुळे वर्षभर पुत्रपौत्रादी सर्व सुखी राहतात.

श्रावणी

शुक्ल यजु: तैत्तरीय श्रावणी

श्यामाकाग्रयण

अग्रायण म्हणजे नवीन धान्याचा  स्थालीपाक ( होम ) करुन त्यानंतरच तो भक्षण करणें. अग्रयणाचे प्रकार तीन आहेत . व्रीह्याग्रयण , यवाग्रयण , आणि श्यामाकाग्रयण. त्या तीन आग्रयणांमध्यें श्यामाकाग्रयण अनित्य आहे . इतर दोन आग्रयणें अनाहिताग्नि ( आधान न केलेल्या ) गृहस्थाला नित्य आहेत.  
श्यामाक ( सांवे ), नीवार ( तृणधान्यें ) यांचा उपयोग करून  वर्षाऋतूंत व आपत्कालीं होम करावा . इतर द्रव्यानें किंवा जुन्या व्रीह्यादिकांनीं होम करुं नये .

हयग्रीवोत्पत्ति


श्रावणी गुरुवार

दर गुरुवारी बुध-बृहस्पति पूजन करावे.

अन्वाधान

अग्नी हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ष्टिच्या च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.

ऋषितपर्ण

श्रावण शुक्ल पौर्णिमेला सर्व ऋग्वेदी, यजुर्वेदी, सामवेदी स्वाध्यायी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्‍य, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आदी कोणत्याही आश्रमाचे विद्यार्थी आपपल्या वेद, कार्य आणि क्रियेच्या अनुकूलतेप्रमाणे करीत असतात. त्याचा विधी थोडक्यात असा-
नदीच्या किनारी जाऊन यथाविधी स्नान करून कुशनिर्मित ऋषींची स्थापना करावी व त्यांचे पूजन, तर्पण, विसर्जन करून रक्षोपोटलिका करून त्याचे मार्जन करावे. त्यानंतर पुढील वर्षीचा अध्ययनक्रम निश्‍चित करून सायंकाळी व्रतसमाप्ती करावी. यामध्ये उपाकर्मपद्धतीनुसार अनेक कर्मे असतात. ती विद्वानांना विचारून करावीत. ही कृत्ये चातुर्मासात आचरावयाची असतात. या काळात नद्या रजस्वला असतात, असे मानतात. तरीही
'उपकर्मणी चोत्सर्गे प्रेतस्नाने तथैवच ।
चंद्रसूयग्रहेचैव रजोदोषो न विद्यते।'
या वसिष्ठवचनानुसार उपाकर्म दोष होत नाही.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment