तिथी
|
श्रवण कृष्ण १४ (१४:०४)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
आश्लेषा (९:४९)
|
योग
|
परिघ (८:२९)
|
करण
|
चतुष्पाद (२६:१५)
|
पिठोरी अमावस्या
एक काम्य व्रत.
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. ज्यांची मुले जगत नाहीत, अशा स्त्रिया पिठोरीचे व्रत करतात. हे व्रत पूजाप्रधान असून, चौसष्ट योगिनी या त्याच्या देवता आहेत. या व्रताचे विधान
असे -
श्रावण अमावस्येच्या
दिवशी दिवसभर उपोषण करावे. सायंकाळी स्नान करून सर्वतोभद्र मंडलावर आठ कलश
स्थापावे. त्यावर पूर्णपात्रे ठेवून त्यांत ब्राह्मी, माहेश्वरी, इ. शक्तींच्या मूर्ती स्थापाव्या. तांदुळाच्या राशीवर
चौसष्ट सुपार्या मांडून त्यावर चौसष्ट योगिनीचे आवाहन करावे. त्यांची षोडशोपचारे
पूजा करावी. नंतर व्रतासाठी केलेले पक्वान्न डोक्यावर घेऊन 'कोणी अतिथी आहे काय? असा प्रश्न विचारावा. मुलांनी 'मी आहे' असे म्हणून ते पक्वान्न मागच्या बाजूने काढून
घ्यावे.
पूर्वी पूजेच्या
मूर्ती पिठाच्या करीत. अलिकडे त्यांची छापील चित्रे मिळतात. या व्रतात
नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करतात. त्यावरून या तिथीला पिठोरी अमावास्या असे
नाव पडले असावे.
दर्शश्राद्ध
दर्शाच्या दिवशी
केले जाणारे श्राद्ध पितृत्रयी, मातृत्रयी व मातामहत्रयी
यांना उद्देशून करतात. हे श्राद्ध नेहमीच्या श्राद्धासारखेच असते.
मातृदिन
भारतामध्ये
श्रावण अमावस्येच्या दिवशी मातृदिन साजरा केला जातो. श्रावण अमावस्येला
रात्री ६४ योगिनी यांची पूजा केली जाते, ही पूजा ज्यांची
मुले जगत नाहीत अशा स्त्रियांनी करावयाची आहे, त्या पूजेमुळे
मुले जगतात असे फळ सांगितले असल्याने त्या योगिनी मातृवत होतात म्हणून त्या
दिवसाला मातृदिन असे रूढार्थाने म्हटले असावे.
आपल्या आईबद्दल
आदर प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. भारतीय संस्कृतीमध्ये मातेच
स्थान अतिशय उच्च असल्याचे सांगण्यात आलेले आहे. माता ही आपली सर्वश्रेष्ठ गुरु
मानली गेली आहे.
ऋग्वेदामध्ये
अनेक ठिकाणी मातेची महती वर्णन केलेली आहे. तिला सर्वांहून अधिक घनिष्ट आणि प्रिय
मानले गेले आहे.
अथर्ववेदामध्ये 'मात्रा भवतु सम्मना:' पुत्राने मातेला
अनुकूल असा मनोभाव धारण करून राहावे असे सांगितलेले आहे.
प्राचीन काळी
गुरुकडील अध्ययन पूर्ण झाल्यानंतर शिष्याला निरोप देताना आचार्य उपदेश करीत असत.
त्यात "मातृदेवो भव" मातेची देवाप्रमाणे पूजा कर असे सांगत असत.
वसिष्ठाने मातेचे श्रेष्ठत्व वर्णन करताना पुढीलप्रमाणे म्हटले आहे -
"दहा
उपाध्यायांपेक्षा एक आचार्य श्रेष्ठ आहे. शंभर आचार्यांपेक्षा एक पिता श्रेष्ठ आहे
आणि एक सहस्र पित्यांपेक्षा एक माता ही अधिक श्रेष्ठ आहे."
धर्मसूत्रांनी
मातेची सेवा-शुश्रूषा आणि तिचे भरणपोषण हे पुत्राचे आवश्यक कर्तव्य म्हणून
सांगितलेले आहे. गौतम ऋषींचा पुत्र चिरकारी याने मातृमहात्म्याचे सुंदर चित्र
इंद्रापुढे उभे केले होते.
नास्ति मातृसमा
छाया नास्ति मातृसमा गति:|
नास्ति मातृसमं
त्राणं नास्ति मातृसमा प्रिया||
मातेसारखी छाया
नाही, मातेसारखे आश्रयस्थान नाही, मातेसारखे रक्षण नाही आणि मातेइतकं प्रिय कुणीही नाही.
चिरकारी पुढे
म्हणतो - "ती मुलांना जन्म देते म्हणून जननी. त्यांच्या अंगप्रत्यंगांना
पुष्टी देते म्हणून अंबा आणि वीर संतती उत्पन्न करते म्हणून विरप्रसू म्हटले जाते.
माता हे सर्व पीडितांचे सुख आहे. ती असते म्हणून लोक सनाथ असतात आणि ती गेल्याने
अनाथ होतात.
सतीपूजन
याच दिवशी सतीचे
पूजनही करतात. सर्व सौभाग्यवायने, आभूषणे एकत्र करून त्याला
सात प्रदक्षिणा करतात. यात घरच्या मुलींनी भाग घ्यायचा नसतो.
श्रावणी बुधवार
दर बुधवारी बुध-बृहस्पति
पूजन करावे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment