दीपपूजन
आषाढी अमावास्या "दीप अमावास्या" म्हणुन पाळली जाते. या दिवशी घरातील सर्व दिव्यांना (नीराजन, पणती, समयी पासून कंदील, इलेक्ट्रिक दिव्यापर्यन्त सर्वांना ) घासून पुसून स्वच्छ करून ते पेटवले जातात. त्यांची पूजा केली जाते.कहाणी दिव्याच्या अंवसेची
ऐका दीपकांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला. त्यांनीं रात्रीं हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू-दिरांनी निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घांसावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडीसाखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या अंवसेचे दिवशीं त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणं हीघरांतून निघाल्यावर तें बंद पडलं.
पुढं ह्या अंवसेच्या दिवशीं राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखालीं मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टिस एक चमत्कार पडला. आपले सर्व गांवातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत. कोणाचें घरीं जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली, वगैरे चौकशी चालली आहे. सर्वत्रांनी आपाआपल्या घरीं घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्यामागून राजाच्या घरचा दिवा सांगूं लागला. बाबांनो, काय सांगू ?
यंदा माझ्यासारखा हतभागी कोणीं नाहीं. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचा, माझा थाटमाट जास्ती व्हायचा, त्याला यंदा अशा विपत्तींत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं. असं होण्याचं कारण काय ? मग तो सांगूं लागला. बाबांनो, काय सांगूं ? मी ह्या गांवच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती, तिनं एके दिवशीं घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरानें विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा. असा सर्वांनी विचार केला. रात्रीं तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासू-दिरांनीं निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दर वर्षी माझी मनोभावं पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो ! असं म्हणून तिला आशीर्वाद दिला.
घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाहीं अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्षा पाहिलें आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवून घरीं आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. सार्या घरांत मुखत्यारी दिली. ती सुखानं रामराज्य करूं लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो ! ही सांठा उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.
कहाणी दिव्याच्या आवसेची
- २
तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले
होती..!
लहानपणीच दोघांनी असं ठरविले की गौरीला ज्या मुली होतील
त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या...!
पुढे गौरीला तीन मुली व विनीतला तीन मुले झाली..!
गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात
लक्ष्मी नांदत होती. परंतु विनीतचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला...!
भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची
लग्न श्रीमंतांच्या घरात केली..!
नंतर सगुणेचा विचार करू लागली.
गौरीने (आईने) भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून
सगुणेला वाईट वाटले...!
तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरविले..!
गौरी तिच्यावर संतापली. परंतु तिने हेका सोडला नाही..!
लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली. गरिबीतच संसार सांभाळू
लागली...!
एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची
रत्नजडीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली...!
अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती
खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली...!
नंतर ती सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिने ती
राजाला नेऊन दिली..!
राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर
माग, असे सांगितले..!
सगुणेने मागितले की, ‘फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी
दिवे असावे व दुसर्या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा.’’ ..!
राजाने तसे केले. मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे
लावले...!
तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते...!
आपल्या दोन्ही दीरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व
येणार्या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने
जाणार्या बाईकडून परत येणार नाही..!
अशी शपथ घाल...!
त्याप्रमाणे त्यांनी केले. अशारितीने फक्त लक्ष्मी तिच्या
घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली..!
या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात
धनधान्य
खूप झाले...!
राज्यातले लोक
सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले...!!
No comments:
Post a Comment