Saturday, 26 September 2015

दिनविशेष - ३० सप्टेंबर २०१५

तिथी
 भाद्रपद कृ. ३ (२१:४३)
वार
 बुधवार
नक्षत्र
 अश्विनी (१२:२१)
योग
 व्याघ्रात (०८:१४), हर्षण (२८:३३)
करण
 वणिज (११:१८)

बृहद् गौरी (डोरली व्रत)

एक काम्य स्त्रीव्रत. भाद्रपद वद्य तृतीया ही व्रताची तिथी होय. याचा विधी असा - फळाफुलांनी युक्त असा बृहती (रिंगणी) चा वेल मुळासकट आणून तो वेळूच्या वेदीत पुरतात. त्याच्यापुढे पंचसूत्री दोरा ठेवतात. मग रात्री चंद्रोदय झाल्यानंतर पाच सुवासिनींसह त्या वेलाला गौरी मानून, त्याची पूजा करतात. पूजेनंतर तो दोरा गळ्यात बांधून चंद्राची पूजा करतात. त्याला कणकेच्या लाडवांचा नैवेद्य दाखवतात. त्यांतले अर्धे लाडू ब्राह्मणाला देतात. तसेच, कणकेची रिंगणी एवढी फळे करून त्याची वायने देतात.
पाच वर्षे उद्यापन करून त्याचे उद्यापन करतात. त्यावेळी चौसष्ट बियांनी युक्त असे रिंगणीएवढे सुवर्णफल तयार करून ते गौरीला अर्पण करतात. ब्राह्मण-सुवासिनींना भोजन घालतात.

कजरी तृतीया

भाद्रपद वद्य तृतीयेस उत्तर प्रदेशातल्या स्त्रिया कजरीची पूजा करतात. या दिवशी गहू, चणे व तांदूळ यांच्या पिठात तूप, साखर वगैरे घालून त्याचे गोड पदार्थ बनवितात. म्हणून या व्रताला हे लोक सातुडी (सत्तू = पीठ ) तीज किंवा सतवा वीज असे म्हणतात.
उत्तर प्रदेशात या दिवशी स्त्रिया झाडाला झूले टांगतात व त्यावर झोके घेत कजरीची गीते गातात.

भरणी श्राद्ध

भरणीश्राद्ध अपिंडक षड्‌देवतांच्या उद्देशाने सांकल्पविधीने करावे. याला धूरिलोचन अथवा पुरूरवार्द्रव हे देव घ्यावे. भरणी श्राद्ध काम्य आहे. गयाश्राद्धाचे फल इच्छिणाराने प्रतिवर्षी करावे.

दग्धयोग

२१:४३ पर्यंत बुधवारी तृतिया असल्यामुळे दग्धयोग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी

मृत्यू योग

१२:२१ पर्यंत बुधवारी अश्विनी नक्षत्रामुळे होणारा मृत्यू योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त

भद्रा


११:१८ नंतर २१:४३ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment