तिथी
|
मार्गशीर्ष कृष्ण १२ (अहोरात्र)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
विशाखा (७:२६)
|
योग
|
शूल (१७:२३)
|
करण
|
कौलव (१९:३०)
|
भागवत एकादशी
प्रत्येक
चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील ११ वी तिथीला एकादशी म्हटले जाते. एकादशीला
हरिदिनी असेही म्हणतात. एकादशी विष्णूची तिथी मानलेली असून या दिवशी उपवास करतात.
दुसर्या दिवशी त्याची पारणा करतात. एकादशीत स्मार्त आणि भागवत असे दोन भेद
सांगितले आहे. ज्या पक्षात हे दोन भेद संभवतील, त्यावेळी
पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त व दुसर्या दिवशी भागवत असे लिहिलेले असते. भागवत
एकादशी नेहमी द्वादशीयुक्त असते. वैष्णवलोक भागवत एकादशी पाळतात.
या दोन एकादश्या
केव्हा मानायच्या यासंबंधी धर्मसिंधु, निर्णयसिंधु आदि ग्रंथात
सविस्तर विवेचन केलेले आहे. मध्ययुगात शूलपाणीने (इ.स. १३७५- १४६०) एकादशी विवेक व
रघुनंदनाने (इ.स. १६ वे शतक) एकादशी तत्त्व हे ग्रंथ फक्त एकादशीवर लिहिलेले
आढळतात. या व्यतिरिक्त व्रतराज व कालतत्त्व विवेचन या ग्रंथातसुद्धा एकादशीवर
भरपूर लेखन केलेले आढळते.
एकादशीचे नित्य व
काम्य असे प्रकार सांगितले आहेत. एकादशीच्या दिवशी ब्रह्महत्यादी सर्व पापे अन्नाचा
आश्रय करून राहतात. म्हणून जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करतो त्याला ती
पापे लागतात. म्हणून एकादशीला उपवास करण्यास सांगितले जाते. वर्षाच्या २४ एकादश्या
नियमाने करणे व त्या दिवशी विष्णुपूजा, जागरण, हरिकथा श्रवण इ. गोष्टी करणे हे नित्य व्रत सांगितले आहे.
काम्यव्रताविषयी कात्यायनाने लिहिले आहे ते असे – जो कोणी
विष्णुपरायण होऊन संसार सागरातून तरून जाऊ इच्छितो किंवा ऐश्वर्य, संतती, स्वर्ग, मोक्ष किंवा अन्य कोणतेही फल इच्छितो त्याने उभय पक्षातील
एकादशीला अन्न ग्रहण करू नये.
तुकारामाने
एकादशीचे महत्त्व अभंगातून सांगितले आहे. तो अभंग असा –
एकादशीस अन्नपान|
जे नर करिती भोजन|
श्वान
विष्ठेसमान| अधम जन तो एक॥
सेज बाजविलास भोग| करी कामिनीशी संग|
तया जोडे क्षय
रोग| जन्मव्याधी बळिवंत॥
अमृत योग
७:२६ नंतर बुधवारी अनुराधा नक्षत्र असल्यामुळे अमृतसिद्धी
योग होत. आहे. हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि
वार यांच्या संयोगाने हा योग होतो.
पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – हस्त
|
सोमवार – मृग / श्रवण
|
मंगळवार – अश्विनी
|
बुधवार – अनुराधा
|
गुरुवार – पुष्य
|
शुक्रवार – रेवती
|
शनिवार – रोहिणी
|
|
हा सामन्यात:
सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
|
विवाहास वर्ज
|
शनिवार – रोहिणी
|
प्रयाणास वर्ज
|
मंगळवार – अश्विनी
|
गृहप्रवेशास वर्ज
|
वृद्धी तिथी
ज्या
तिथीला कोणताही सूर्योदय होत नाही ती क्षय तिथी असते.
लागोपाठच्या
दोन सूर्योदयाच्या वेळी एकचतिथी असेल तर तिला तिथी वृद्धी म्हणतात.
क्षय
तिथी, वृद्धी तिथी, कृ. १३, कृ १४, अमावास्या व शु. १ या सहा तिथी शुभ कार्यासाठी
पूर्णपणे अशुभ सांगितलेल्या आहेत.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment