तिथी
|
आश्विन शुक्ल ११ (२१:१५)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
धनिष्ठा (१९:३२)
|
योग
|
शूल (१५:५३)
|
करण
|
वणिज (०९:५७)
|
पाशांकुशा एकादशी
पापपरायण पुरुषांच्या पापनिर्मूलनासाठी आश्विन शुक्ल एकादशीचे व्रत म्हणजे
रामबाण उपाय होय. म्हणूनच या एकादशीला पापाङ्कुशा एकादशी म्हणतात. या व्रताने
स्वर्गप्राप्ती व मोक्षप्राप्ती होते. आरोग्य टिकून राहते, सुंदर व सुशील पत्नी लाभते, सदाचारी पुत्र लाभतो आणि अक्षय धन
प्राप्त होते. त्या दिवशी भगवान विष्णूचे पूजन करावे आणि रात्री त्याचेच भजन, चिंतन, नामगुणसंकीर्तन करण्यात काल
घालवावा. दुसर्या दिवशी पूर्वाण्ह्समयी पारणे करून व्रताची समाप्ती करावी.
पुत्रप्राप्ती व्रत
आश्विन शुक्ल एकादशीला स्नान करून उपवाअ करावा आणि भगवान विष्णुची पूजा
करावी. रात्री दूध देणार्या सवत्स गाईची पूजा करावी. दुसर्या दिवशी दिवसभर
व्रतस्थ राहून रात्री भोजन करावे. अशा तर्हेने दर आश्विन शुक्ल एकादशीस
याप्रमाणे बारा वर्षे किंवा दर महिन्याच्या शुक्ल एकादशीस याप्रमाणे बारा महिने हे
व्रत करावे. द्वादश वर्षीय व्रताच्या दरवर्षी किंवा एकवर्षीय व्रताच्या दर
महिन्यात क्रमश: (पहिल्या वर्षी / महिन्यात पहिला याप्रमाणे) पुढील नामजप करावा -
अपराजित, अजातशत्रू, पुराकृत, पुरंदर, वर्धमान , सुरेश, महाबाहू, प्रभू , विभू , सुभूती, सुमन, सुप्रचेता
या नावाने हरिस्मरण केले असता देवतुल्य दीर्घायुषी पुत्र लाभतो.
आकाशदिवा
आश्विन शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत, घराच्याबाहेर एक उंच खांब पुरून
त्यावर दोरीच्या साहाय्याने जो दिवा टांगतात, त्यास आकाशदिवा असे म्हणतात. त्याचा विधी पुढीलप्रमाणे - घरापासून जवळच थोडी
जमीन गोमयाने सारवावी. तीवर चंदनयुक्त जलाने प्रोक्षण करून अष्टदल कमल काढावे.
मध्यभागी वीस हात, नऊ हात किंवा पाच हात लांबीच खांब पुरावा. तो वस्त्र, पताका, अष्टघंटा, कलश यांनी सुशोभित करावा. त्यावर
अष्टदलाकृती दीप करून अडकवावा. त्या दीपात मोठा दिवा लावावा. त्याभोवती कमळाच्या
प्रत्येक पाकळीत एक असे आठ दिवे धर्म, हर, भूती, दामोदर, धर्मराज, प्रजापती, पितर व प्रेत यांना उद्देशून
लावावे. दिव्यात तिळाचे तेल घालावे. नंतर दीपाची पंचोपचार पूजा करून तो पुढील
मंत्राने वर चढवावा.
दामो ऽ दराय नभसि तुलायां लोलयासह ।
प्रदीपं ते प्रयच्छामि नमोनन्ताय वेधसे ॥
याचे फल लक्ष्मीप्राप्ती हे आहे.
घबाड
२१:१५ नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: चित्रा
चंद्र
नक्षत्र : शततारका
तिथी: १२
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ११
११
x ३ = ३३
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १२ तिथी मिळवू : ३३ + १२ = ४५
आता
७ ने भागू ४५ / ७ = ६ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
भद्रा
९:५७ नंतर २१:१५ पर्यंत भद्रा
म्हणजेच विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या
वेळी भागान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या
देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही
गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ
झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा
पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे
दोन्ही पक्षात चर चर वेळा भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ
व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन
व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु
व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे
असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता
ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी
असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा
दोष माणू नये.
योग्य व वर्ज कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग,
अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट
इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ.
कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे
अग्निभय होण्याची शक्यता असते.
भद्रा मुख व पृच्छ:
ज्या तिथीत भद्रा असेल त्या
आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. ते अत्यंत अशुभ होय.
तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून
सर्व कार्यास प्रशस्त मानावे.
मोहरम
मोहरम किंवा मुह्हरम हा एक
मुस्लिम सण आहे. इस्लाम साठी मोहरम हा वर्षारंभ मानतात.
पैगंबर म्हणजे इस्लामचा 'पैगाम 'म्हणजे संदेश माणसापर्यंत
पोचवणारा. पैगंबराने हा धर्म निर्माण केला. त्याला या धर्माचा 'इलहाम' झाला. त्याला जेव्हा याचा 'इलहाम' झाला म्हणजे दृष्टांत झाला
त्यावेळेस त्याला आपण काय बोलत आहोत, कुठे आहोत याची जाणीव उरलेली नव्हती. त्या दिवसापासून याला, "सल्लील्लाहू अलेह
वसल्लम हजरत पैगंबर नबी" असे म्हणू लागले. सुरवातीस हा युद्ध व रक्तपातास
निशिद्ध असा महिना होता. हा महिना तसा पवित्र होता, परंतु इमाम हुसेन याच्या वधाची घटना याच
महिन्यात घडली म्हणून हा महिना अशूभ ठरला. हजरत पैगंबर नबी साहेबांचे मुलीकडून
नातू असलेले हसन व हुसेन यांना त्यांच्या शत्रूंनी म्हणजे सुन्नी पंथाच्या
खलीफांनी इ.स. च्या सातव्या शतकात करबला मैदानात "दर्दनाक मौतीचा"
अविष्कार करत ठार मारले.हा ताबूत बनविण्याचा प्रघात चौदाव्या शतकात विदेशी आक्रमक
लंगडा अमीर तैमूरलंगने सुरू केला. या ताबुताचे तोंड मक्केकडे यांच्या
श्रद्धास्थानाकडे करतात. हुसेनचे हत्याकांड झाले त्या दिवशी शत्रूने हुसेनच्या
नातेवाईकांना पाणीही मिळू होऊ दिले नाही, म्हणून आज थंड पाण्याची सोय ठिकठिकाणी करतात.
शेवटच्या दिवशी सर्व ताबूतांची मिरवणूक काढतात. हा ताबूत प्रकार फक्त भारत, पर्शिया व इजिप्तमध्ये
पाळतात. हा प्रकार अरबस्तानात पाळत नाहीत. ते हा प्रकार अधार्मिक मानतात. कट्टर
मुसलमान ताबूत हा मुर्तीपुजेचा प्रकार म्हणून निषिद्ध मानतो. शेवटच्या दिवशी एका
दांडक्याला 'पंजा' लावून चांगले वस्त्र बांधतात.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment