वसुबारस/ गोवत्स द्वादशी / वछबाँछ
आश्विन कृष्ण
द्वादशीला हे व्रत करतात. यासाठी प्रदोषव्यापिनी तिथी मानली जाते. जर दोन्ही दिवस
प्रदोषव्यापिनी असेल अगर दोन्ही दिवस नसेल, तर
'वत्सपूजा वटश्चैव कर्तव्ये प्रथमेऽदिने'
यानुसार व्रत
पहिल्याच दिवशी करतात. संध्याकाळी गाई चरून आल्यानंतर तुल्य रंगाच्या गायवासरांची
गंधादी उपचारांनी पूजा करून-
'क्षीरोदार्णवसंभुते सुरासुर नमस्कृते ।
सर्वदेवमये
मातर्गृहाणार्घ्यं नमोस्तु ते ।'
हा मंत्र म्हणून
पुढील पायावर अर्घ्य द्यावे आणि
'सर्वदेवमये देवि सर्वदेवैऽरलंकृते ।
मातर्ममाभिलषितं
सफलं कुरु नंदिनी ।'
अशी प्रार्थना
करावी. त्या दिवशीच्या जेवणात गाईचे दूध, दही, तूप,
ताक, खीर,
तसेच तेलात तळलेली भजी इ.
पदार्थ असू नयेत.
या तिथीला 'वसुबारस' असेही म्हणतात. या दिवशी
सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून हे व्रत करतात. सकाळी अथवा सायंकाळी सवत्स
गाईची पूजा करतात व पुढील मंत्राने तिची प्रार्थना करतात -
'तत: सर्वमये देयि सर्वदेवैरलङ्कृते ।
मतर्ममाभिलषितं
सफलं कुरु नंदिनि ॥'
या दिवशी
तेला-तुपात तळलेले पदार्थ खात नाहीत. गाईचे दूध, तूप, ताक खात नाहीत. गाईला उडदाचे वडे, भात, गोडधोड पदार्थ खाऊ घालतात. उत्तर प्रदेशात या व्रताला 'वछबाँछ' असे म्हणतात.
समुद्रमंथनात
पाच कामधेनु उत्पन्न झाल्या. त्यातील नंदा
नावाच्या कामधेनूला उद्देशून हे व्रत आहे.
No comments:
Post a Comment