तिथी
|
आश्विन शुक्ल पोर्णिमा (९:५३), आश्विन कृष्ण १ (३०:०९)
|
वार
|
रविवार
|
नक्षत्र
|
रेवती (११:१४)
|
योग
|
हर्षण (२२:१८)
|
करण
|
बालव (२०:०२)
|
कार्तिकस्नानारंभ
सर्व धर्मकृत्यांत
स्नानास फार महत्त्व असून त्याची फार आवश्यकता असते. तसेच, स्नानामुळे
मनुष्याच्या आरोग्याचे रक्षण व निरोगीपण यात वाढ होते. माघ, कार्तिक व वैशाख या महिन्यांतील नित्य स्नानाला तर आगळेच
महत्त्व आहे.
कार्तिकं सकलं
मासं नित्यस्नायी जितेंद्रिय: ।
जपन् हविष्यभुक्छान्त:
सर्वपापै: प्रमुच्यते ॥'
अर्थ - संपूर्ण कार्तिक महिनाभर जितेन्दिय राहून
नित्य स्नान केले व हविष्यान्न घेतले तर सर्व पापांपासून मुक्ती मिळते.
हे व्रत आश्विन
पौर्णिमेस चालू करून ३१व्या दिवशी म्हणजे कार्तिक पौर्णिमेपर्यंत करावे व त्या दिवशी
समाप्ती करावी. किंवा या स्नानाची सुरुवात दशमी किंवा एकादशीपासून करतात. या काळात
स्नानासाठी विहीर अगर तळे यांचा वापर करावा. कुरुक्षेत्र, अयोध्या इ.
तीर्थे व पुर्या व काशीच्या पाचही नद्यांतील स्नानाला तर आगळेच महत्त्व आहे. असे
योग दुर्लभ असतात. पाण्यात उतरण्यापूर्वी बाहेरच हातपाय धुवावेत. आचमने करून
शेंडीस गाठ मारून दर्भाने संकल्प सोडून मगच स्नान करावे.
हे कार्तिक स्नान
पुत्रप्राप्तीसाठी व्रत म्हणून केले असेल तर स्नानानंतर अभिलाष्टक नावाचे स्तोत्र
पठण करावे. संपूर्ण महिनाभर प्रात:स्नान करणे शक्य नसल्यास निदान कार्तिक शु.
एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत पाच दिवस करावे.
जेष्ठ आपत्यास ओवाळणे / आश्विनी
आश्विन
पौर्णिमेस सायंकाळी आई आपल्या सर्वांत मोठ्या मुलाला (मुलगा किंवा मुलगी) ओवाळून
त्याचे औक्षण करते व त्याला दूध प्यायला देते. विशेषत: महाराष्ट्रात हा प्रघात
आहे. याला मुलांची आश्विनी करणे, असे म्हणतात.
आग्रयण
नवान्नप्राशन
आश्विन
पौर्णिमेस नवीन धान्याचें भक्षण; नवीन तांदुळाच्या
केलेल्या भाताचा स्थालीपाक (होम) करुन तो
भक्षण करावे
रविचा तुला राशीत प्रवेश
३०:३१ ला रवि तुला राशीत
प्रवेश करीत आहे.
रवि
संक्रमणाच्या वेळी, तुला राशीसाठी संक्रमणापूर्वी व
नंतर १०/१५ घटिका पुण्यकाळ असतो. मात्र यामध्ये रात्रीची वेळ घेत नाहीत. म्हणून पुण्यकाल पुढील दिवशी म्हणजे १७ तारखेला सूर्योदयापासून १२:२४
पर्यंत आहे. पुण्याकालात
स्नान, दान इ. गोष्टी अधिक शुभ मानल्या आहेत.
सामुदायिक
मुहूर्त ३० म्हणजे साम्यार्घ आहेत. रविच्या राशी संक्रमाणाच्या
वेळी असणाऱ्या चंद्र नक्षत्रावरून ३ प्रकारचे सामुदायिक मुहूर्त होतात. ते व
त्यांची फळे पुढील प्रमाणे:
·
१५ : महर्घ / जघन्य : फळ = तेजी
·
३० : साम्यार्घ : फळ = सम
·
४५ : समर्घ : फळ = मंदी
इष्टि
इष्टि म्हणजे
यज्ञ.
यज्ञ
संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि
म्हणतात.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment