Wednesday, 5 October 2016

दिनविशेष - ६ ऑक्टोबर – २०१६




तिथी
 आश्विन शुक्ल ५ (१७:३२)  
वार
 गुरुवार
नक्षत्र
 अनुराधा (११:४१)
योग
 आयुष्यमान (१९:०७)
करण
 कौलव (--:--)


ललिता पंचमी / उपांगललिताव्रत

हे व्रत आश्‍विन शुक्ल पंचमीला करतात. यासाठी रात्रिव्यापिनी पंचमी घेतात. व्रत करणाराने त्या दिवशी आघाड्याच्या २१ काटक्या घेऊन
'आयुर्बलमिदम्'
या मंत्राने एकेकाने याप्रमाणे दात घासून स्नान करावे व शुभ्र वस्त्र परिधान करून सुवर्णमयी उपांगललितेची 'यथो मिलितोपचार द्रव्यांनी' पूजा करावी. ४८ दुर्वांची एक जुडी याप्रमाणे ४८ जुड्या ललिता देवीला वहाव्यात. रात्री चंद्रोदय झाल्यावर त्याला अर्घ्य देऊन नक्‍त व्रत करावे. (तदुपरान्त भोजन करावे. ) दुसर्‍या दिवशी देवीचे विसर्जन करावे. हे व्रत महाराष्ट्रात विशेष प्रचलित आहे.

शांतिपंचमी

आश्‍विन शुक्ल पंचमीला प्रात:स्नानादी नित्यकर्मे उरकल्यावर एका वेदीवर किंवा चौरंगावर शुभ्र वस्त्र पसरून त्यावर हिरव्या व कोवळ्या दर्भाचे १२ नाग व एक इंद्राणी बनवून त्यांची स्थापना करावी. इंद्राणीला शुद्धोदकस्नान घालावे आणि नागांना घृत, पय व उदक या तिहींचे स्थान घालावे. गंधपुष्पादिकांनी पूजा करावी. विविध प्रकारच्या नागांचे ध्यान करावे आणि
'नागा: प्रीता भवन्तीह शान्तिमाप्नोति वै विभो ।
स शांतिलोकमासाद्य मोदते शाश्‍वती: समा: ।'
अशी प्रार्थना करून
'ॐ कुरू कुल्ल्यं हुं फट् स्वाहा'
मंत्राचा १२ हजार जप करावा. या कुशनिर्मित नागांपैकी अनंत आश्‍विनात, वासुकी कार्तिकात, शंख मार्गशीर्षात, पद्म पौषात, कम्बल माघात, कर्कोटक फाल्गुनात, अश्‍वतर चैत्रात, शंखपाल वैशाखात, कालिय ज्येष्ठात, तक्षक आषाढात, पिंगल श्रावणात, व महानाग भाद्रपदात याप्रमाणे त्यांची पूजा केली असता सर्पादिकांचे भय दूर होते, सर्व प्रकारची शांती पसरते व उपर्युक्‍त मंत्राने सर्पविष निष्प्रभ होते.

पंचरात्रोत्सवारंभ

नवरात्र सुरू होण्यापूर्वी अशौच आले व महानवमीपूर्वी अशौच संपत असेल तर त्यानंतर सात, पाच, तीन अथवा एक दिवस जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस नवरात्र करावे. अशौचामुळे वर सांगितल्यामुळे कमी दिवसांचे नवरात्र करतात. अशा दिवसांचा उल्लेख सप्तरात्रोत्सवारंभ, पंचरात्रोत्सवारंभ, त्रिरात्रोत्सवारंभ अशा प्रकारे केलेला असतो. अशा दिवशी घटस्थापना करून नवमीपर्यंत नवरात्रीची पूजा करता येते.

गुरु दर्शन

गुरु या ग्रहाचा उदय होत आहे आणि पूर्व दिशेला गुरु दर्शन होईल.
ग्रहांचे सूर्य सानिध्यामुळे अदर्शन होते. यालाच ‘अस्त’ असे म्हणतात. आणि तोच ग्रह सूर्यापासून ठराविक अंतारावर गेला कि त्याचे दर्शन आपल्याला पूर्वेस अथवा पश्चिमेस होऊ लागते. त्याला ‘उदय’ असे म्हणतात.
सूर्यापासून प्रत्येक ग्रह जितक्या अंशावर असता आपल्याला त्याचे दर्शन होऊ शकते म्हणजेच ग्रहाचा उदय होतो, त्याला त्या ग्रहाचे ‘कालांश’ असे संबोधतात. गुरुचे कलांश ११ अंश आहेत.

गुरु हा आकाराने मोठा असा शुभ ग्रह आहे.
गुरु शुभग्रह असल्यामुळे तो अस्तंगत असताना अनेक शुभ कार्यांना वर्ज असतो.
अस्त होण्यापूर्वी काही दिवस त्याच्या तेजाच्या वार्धक्याचे व उदयानंतर काही दिवस तेजाच्या बालात्वाचे म्हणूनही धर्म कार्यात वर्ज सांगितले आहेत.
बालत्व / वृद्धत्व
दिशा
दिवस
बालत्व
पूर्वेस उदय
१५ / १० / ७ / ५ / ३ दिवस
बालत्व
पश्चिमेस उदय
१५ / १० / ७
वृद्धत्व
पूर्वेस अस्त
१५ / १० / ७
वृद्धत्व
पश्चिमेस अस्त
१५ / १०/ ७ / ५

घबाड

१७:३२ नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: हस्त
चंद्र नक्षत्र : जेष्ठा
तिथी: ६ = २५
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६ x ३ = १८
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे ६ तिथी मिळवू : १८ + ६ = २४
आता ७ ने भागू  २४ / ७ = ३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.


दग्ध

१७:३२ नंतर गुरुवारी षष्ठी तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे.  
तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment