अभ्यंगस्नान
चंद्रोदयी पहाटे
५:१४
आश्विन कृष्ण
चतुर्दशीला पहाटे, ज्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी चतुर्दशी असेल
त्या दिवशी सकाळी, शौचमुखमार्जन झाल्यावर-
'यमलोकदर्शनाभावकामोऽहमभ्यंगस्नान करिष्ये ।'
असा संकल्प सोडून
तिळाच्या तेलापासून केलेले उटणे अंगास लावावे. मग नांगरलेल्या जमिनीतील ढेकूळ, तुंबी व आघाडा डोक्याभोवती अनेक वेळा फिरवून स्वच्छ स्नान
करावे. जरी कार्तिक-स्नानात तेलाने अभ्यंग वर्ज्य असले तरी
'नरकस्य चतुर्दश्यां तैलाभ्यंगं च कारयेत् ।
अन्यत्र
कार्तिकस्नायी तैलाभ्यंगं विवर्जयेत् ।'
याअनुसार
नरकचतुर्दशीस तेलाने अभ्यंग स्नान करण्यात कोणताही दोष नाही. जर ही तिथी दोन्ही
दिवस चंद्रोदयव्यापिनी असेल तर चतुर्दशीला चौथ्या प्रहरी आंघोळ करावी. चार दिवस हे
व्रत केल्याने सुखसौभाग्य वाढते.
नरक चतुर्दशी
या चतुर्दशीस 'रूपचतुर्दशी' असेही म्हणतात.
नरकासुराने सोळा
हजार स्त्रियांना आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवले होते. हा नरकासुर प्रजेचाही खूप
छळ करीत असे. भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध आश्विन कृष्ण चतुर्दशीला करून
स्त्रियांची मुक्तता केली. नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला की, आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ
नये. म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले आहे.
या दिवशी चार
वातींची समई प्रज्वलित करून पूर्वेकडे तोंड करून ती
'दन्तो दीपश्चतुर्दश्यां नरकप्रीतये मया ।
चतुर्वर्ति
समायुक्त: सर्वपापान् अनुत्तये ।'
हा मंत्र म्हणून
दान द्यावी. यावेळी एक प्रज्वलित उल्का (दारूसामानाची बनलेली ) घेऊन
'अग्निदग्धाश्च ये जीवा ये ऽ प्यदग्धा: कुले मम
।
उज्जवल
ज्योतिषादग्धास्ते यान्तु परमां गतिम् ।'
या मंत्राने तिचे
दान केले तर उल्का इ. मुळे मेलेले सद्गतीप्रत जातात.
हे एक काम्य व्रत
आहे. या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान झाल्यावर सर्व आन्हिके आटोपून झाल्यावर नक्त
व्रताचा संकल्प करतात. सायंकाळी नरकासुराच्या नावाने चार वातींचा दिवा लावून पुढील
मंत्र म्हणातात -
'अग्निर्ज्योती रविर्ज्योतिश्चद्रोज्योतिस्तथैव
।
सर्वेषां
ज्योतिषां श्रेष्ठी दीपोऽयं प्रतिगृह्यताम्।'
असे म्हणून
देवालये, वाडा, उद्याने वगैरे सर्वत्र
दिवे लावतात. नंतर गवताची अगर अन्य कशाची चूड पेटवून '
अग्निदग्धाश्च ये
जीवा येऽप्यदग्धाः कुले मम।
उज्ज्वलज्योतिषा
दग्धास्ते यान्तु परमाङ्गतिम्॥'
हा मंत्र
म्हणतात. अग्नीने दग्ध होऊन जे मरण पावले असतील, मेल्यावर दग्ध
झाले नसतील तेसुद्धा सर्व या चुडीचा प्रकाशामुळे परमगती पावतात.
शेवटी शैव
ब्राह्मणाला वस्त्रालंकार व भोजन देऊन व्रतकर्त्याने स्वत: उडदाच्या पानांच्या
भाजीने युक्त असे नक्त भोजन करावे, असे सांगितले आहे.
यमतर्पण
आश्विन कृष्ण
चतुदशीला सायंकाळी अपमृत्यू होऊ नये म्हणून पिता असलेल्यांनी पाण्यात अक्षता घालून
व इतरांनी पाण्यात तीळ घालून खालील नावांनी यमतर्पण करावे.
यमंतर्पयामि |
धर्मराजं
तर्पयामि |
मृत्युं तर्पयामि
|
अंतकं तर्पयामि |
वैवस्वतं तर्पयामि |
कालं तर्पयामि |
सर्वभूतक्षयकरं
तर्पयामि |
औदुम्बरं
तर्पयामि |
दध्नं तर्पयामि |
नीलं तर्पयामि |
परमेष्ठिनं
तर्पयामि |
वृकोदरं तर्पयामि
|
चित्रं तर्पयामि
|
चित्रगुप्तं
तर्पयामि |
नतर दक्षिणेकडे तोंड करून पाणी, दर्भ व तीळ हातात घेऊन पुधिल् श्लोक १० वेळा म्हणावा.
यमेनिहंता
पितृधर्मराजो वैवस्वतो दंडधरश्च काल: |
भूताधिपो दत्त
कृतानुसारी एतद्द्शभिर्जपंति ||
जानवे गळ्यात
मालाकार ठेवून तर्पण करताना काळे व पांढरे दोन्ही तीळ वापरावे. कारण यमामध्ये
धर्मराजरूपी देवत्व व यमराजरूपी पितृत्व हे दोन्ही अंश असतात.
दीपदान
आश्विन कृष्ण
चतुर्दशी दिवशी प्रदोषकाळी तिळाच्या तेलाने भरलेले आणि प्रज्वलित असे १४ पूजित
दिवे घेऊन
'यममार्गांधकारनिवारणार्थे चतुर्दशदीपानां दानं
करिष्ये ।'
असा संकल्प सोडून
ब्रह्मा, विष्णू व महेश इ. देवतांच्या देवळांत, सभामंडपात, गाभार्यात, आवारात आणि बागा, गल्ल्या, विहिरी यांच्या आसमंतात, तसेच तबेला व
अन्य एकान्त ठिकाणी दिवे उजळावेत. या
'दिव्यां' च्या व्रताने
यमराज प्रसन्न होतो.
No comments:
Post a Comment