तिथी
|
आश्विन शुक्ल ८ (२२:३१)
|
वार
|
रविवार
|
नक्षत्र
|
पूर्वाषाढा (१८:३४)
|
योग
|
अतिगंड (१९:५४)
|
करण
|
विष्टि (१०:०३)
|
दुर्गाष्टमी / महाअष्टमी
आश्विन शुक्ल अष्टमीला देवीच्या उपासनेची अनेक अनुष्ठाने होतात म्हणून ही
तिथी महाष्टमी म्हणून ओळखली जाते. या तिथीस सप्तमीचा वेध व्रताचाराच्या दृष्टीने
वर्ज्य समजावा व नवमीच ग्राह्य मानावा. या दिवशी देवी शक्तिधारणा करते. नवमीला
पूजासमाप्ती होते. म्हणून सप्तमी वेधयुक्त महा-अष्टमीला पूजन केल्याने
पुत्र-स्त्री-धनहानी होते. जर अष्टमी मूळ नक्षत्रयुक्त व नवमी पूर्वाषाढायुक्त
असेल अथवा दोहोंनी युक्त असेल तर ती महानवमी होते. सूर्योदयासमयी अष्टमी, सूर्यास्तसमयी नवमी आणि वार
मंगळवार असेल तर तो योग अधिक श्रेष्ठ समजावा.
महाष्टमीला प्रात:काळी शुचिर्भूत होऊन भगवतीची वस्त्र, शस्त्र, छत्र, चामर राजचिन्हादिसहित पूजा करावी.
त्यावेळी भद्रावती योग असेल तर पूजा संध्याकाळी करावी. आणी अर्धरात्रीला बलिप्रदान
करावे. कित्येक ठिकाणी या दिवशी 'अखिलकारणी' देवीचे पूजन करतात. हे पूजन भद्रासहित सायंकाळ किंवा प्रात:काळ केव्हाही करता
येते. त्यात केवळ त्रिशूळाची पूजा होते.
अलक्ष्मी : (लक्ष्मी नव्हे ती )
या देवीचे वर्णन आगम व विष्णुपुराण यांत आढळते. ती कृष्णवर्ण, रक्तनेत्र; द्विभुज, लांब नाकाची, स्तन व पोट मोठे असलेली, कमळ व काकध्वज धारण करणारी, बैलासारखी तोंड असलेली व कन्यापुत्रसहित असते. केरसुणी हे तिचे आयुध होय.
शीतलादेवीचे स्वरूपही काही अंशी अलक्ष्मीसारखेच आहे. या वर्णनाशी जुळणार्या काही
मध्ययुगीन शिल्पकृती.
हिचा फेरा आपल्या घरावर येऊ नये म्हणून काही ठिकाणी आश्विन शुक्ल अष्टमीस
महालक्ष्मीच्या पूजेआधी ज्येष्ठा या नावाने हिची पूजा करून घराबाहेर तिचे विसर्जन
करतात. ही घरातून निघून जावी म्हणून काही ठिकाणी मागील दारी एक वात लावून ती
घराच्या कोनाकोपर्यात फिरवून पुढील दारी आणुन टाकतात. हा प्रकार म्हणजे
अलक्ष्मीला बाहेरची वाट दाखविणे होय. याच्याउलट बाहेर वात लावून ती घरात आणणे
म्हणजे लक्ष्मीला घरात येण्याचा मार्ग दाखविणे, असे समजतात. बंगालमध्ये आश्विनी
अमावस्येस शेणाची 'क्षणिका अलक्ष्मी' बनवून लक्ष्मीप्रमाणेच तिची पूजा करतात व मग तिचे विसर्जन करतात.
जीवत्पुत्रिका व्रत
एक स्त्री-व्रत.
आश्विन शुक्ल अष्टमीस उत्तर प्रदेशातील स्त्रिया हे व्रत.करतात. या दिवशी उपवास
करून दान देतात. हे व्रत केल्याने पुत्रशोक होत नाही. असे सांगितले आहे.
महाष्टमी उपवास
अष्टमीचा उपवास या दिवशी
करावा.
मुख्य सरस्वती पूजन
या दिवशी पूर्वाषाढा
नक्षत्रावर सरस्वती पूजन करावे.
एकरात्रोत्सवारंभ
नवरात्र सुरू
होण्यापूर्वी अशौच आले व महानवमीपूर्वी अशौच संपत असेल तर त्यानंतर सात, पाच,
तीन अथवा एक दिवस जेवढे
दिवस मिळतील तेवढे दिवस नवरात्र करावे. अशौचामुळे वर सांगितल्यामुळे कमी दिवसांचे
नवरात्र करतात. अशा दिवसांचा उल्लेख सप्तरात्रोत्सवारंभ, पंचरात्रोत्सवारंभ, त्रिरात्रोत्सवारंभ अशा प्रकारे केलेला असतो. अशा दिवशी
घटस्थापना करून नवमीपर्यंत नवरात्रीची पूजा करता येते.
भद्रा
१०:०३ पर्यंत भद्रा म्हणजेच
विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या
वेळी भागान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या
देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही
गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ
झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा
पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे
दोन्ही पक्षात चर चर वेळा भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ
व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन
व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु
व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे
असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता
ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी
असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा
दोष माणू नये.
योग्य व वर्ज कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग,
अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट
इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ.
कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व
फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.
भद्रा मुख व पृच्छ:
ज्या तिथीत भद्रा असेल त्या
आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. ते अत्यंत अशुभ होय.
तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून
सर्व कार्यास प्रशस्त मानावे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment