तिथी
|
आश्विन शुक्ल ९ (२२:५४)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
उत्तराषाढा (१९:४०)
|
योग
|
सुकर्मा (१९:११)
|
करण
|
बालव (१०:४८)
|
महानवमी
नवरात्रोत्थापन व पारणा
आश्विन शुक्ल दशमीला भगवतीचे यथाविधी पूजन करून आरती करावी.
'यज्ञेन यज्ञमयजन्त देवा.....:'
आदी मंत्रपुश्प करावा.
'मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं यदर्चितम् ।
पूर्णं भवतु तत्सर्वं त्वत्प्रसादान्महेश्वरि ॥'
अशी प्रार्थना करावी.
'ॐ दुर्गायै नम: ।'
म्हणून एक फूल ईशान्य दिशेस सोडावे आणि
'गच्छ गच्छ परं स्थानं स्वस्थानं देवि चंडिके ।
व्रतस्रोतो जलं वृद्धयै तिष्ठ गेहे च भूतये ॥'
अशा मंत्राने कलशस्थ देवमूर्ती वगैरे उठवून यथास्थान स्थापित करावी. जर मूर्ती
मृत्तिकेची असेल आणि भात-गहूचे 'रुजवण' आले असेल तर दोन्ही
वाजत-गाजत नजीकच्या जलाशयावर न्यावी आणि त्यांचे विसर्जन करावे. पुढीलप्रमाणे
विसर्जनाचा मंत्र म्हणावा -
'दुर्गे देवी जगन्मात: स्वस्थानं गच्छ पूजिते ।
षण्मासेषु व्यतीतेषु पुनरागमनाय वै ।
इमां पूजां मया देवि यथाशक्त्योपपादिताम् ।
रक्षार्थं त्वं समादाय व्रज स्वस्थानमुत्तमम् ॥
सरस्वती बलिदान
नवरात्रामध्ये मूळ नक्षत्रावर भगवती श्रीसरस्वतीचे आवाहन करतात. दुस-या दिवशी
पूर्वाषाढा नक्षत्रावर पूजन व तिस-या दिवशी उत्तराषाढा नक्षत्रावर सरस्वतीला
बलिदान अर्पण करून तिचे विसर्जन करतात. हा उत्सव विशेषत: बंगाल प्रांतात साजरा
होतो.
सरस्वती विसर्जन
१९:४० नंतर सरस्वती विसर्जन करावे.
देवीला बलिदान
नवमी उपवास
नवमीचा उपवास या दिवशी
करावा.
उल्कानवमी
एक तिथिव्रत. या व्रतात आश्विन शुक्ल नवमीस महिषासुरमर्दिनीची पूजा करतात.
व्रतावधी एक वर्ष. या व्रताला उल्का हे नाव पडण्याचे कारण, हे व्रत करणारा पुरुष त्याच्या
शत्रूंना व व्रतकर्ती स्त्री तिच्या सवतींना उल्केप्रमाणे दिसतो, असे सांगितले आहे.
दुर्गानवमी
आश्विन शुक्ल नवमीचे हे नाव आहे. दुर्गेच्या नावाने व्रतारंभ करतात. व्रतावधी
एक वर्षाचा. आश्विन मासापासून चारमहिन्यांचे तीन भाग करावे आणि प्रत्येक भागात
दुर्गेच्या निरनिराळ्या रूपांची निरनिराळी फुले, सुगंधी द्रव्ये आणि नैवेद्यादी उपचारांनी पूजा करावी.
फल - शक्ती-संपत्ती यांची प्राप्ती.
प्रदीप्त नवमी
एक तिथिव्रत. आश्विन. शुक्ल नवमीला या व्रताला प्रारंभ करतात. व्रतावधी एक
वर्ष. व्रतविधी असा - व्रतकर्त्याने
'ओम् महाभगवत्यै महिषासुरमर्दिन्ये हुं फट्'
या सोळा अक्षरी मंत्राने देवीची पूजा करावी आणि गुग्गुळाचा गोळा अग्नीला अर्पण
करावा. शिवाची पूजा करावी. गवताची एक हात लांबीची काडी घेऊन ती पेटवावी. काडी
जेवढा वेळ जळेल तेवढ्या वेळात जेवढे अन्न खाता येईल तेवढेच खावे.
फल - शक्ती आणि विजय यांची प्राप्ती.
मन्वादि
१४ मन्वंतराच्या आरंभ
झाल्या अशा १४ तिथीना मन्वादि असे म्हणतात. या मन्वादि १४ तिथी पुढे दिल्या आहेत.
१
|
स्वायंभुव
|
चैत्र शुक्ल तृतीया
|
२
|
स्वारोचीस
|
चैत्र शुक्ल पौर्णिमा
|
३
|
उत्तम
|
कार्तिक शुक्ल पौर्णिमा
|
४
|
तामस
|
आषाढ शुक्ल पौर्णिमा
|
५
|
रैवत
|
कार्तिक शुक्ल द्वादशी.
|
६
|
चाक्षुस
|
आषाढ शुक्ल दशमी.
|
७
|
वैवस्वत
|
ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा.
|
८
|
सावर्णी
|
फाल्गुन शुक्ल पौर्णिमा.
|
९
|
दक्ष सावर्णी
|
आश्विन शुक्ल नवमी.
|
१०
|
ब्रह्म सावर्णी
|
माघ शुक्ल सप्तमी
|
११
|
धर्म सावर्णी
|
पौष शुक्ल एकादशी.
|
१२
|
रुद्र सावर्णी
|
भाद्रपद शुक्ल तृतीया.
|
१३
|
देव / रुची सावर्णी
|
फाल्गुन शुक्ल अमावस्या.
|
१४
|
इंद्र/ भूती
सावर्णी
|
श्रावण कृष्ण अष्टमी.
|
‘मनु’ बाबत श्रीमद्भ्गव्दगीतेत
म्हटले आहे
महर्षय: सप्त
पूर्वे चत्वारो मनवस्तथा !
मद्भावा मानसा
जाता येषां लोक इमा प्रजा: !!
(श्रीमद्भ्गव्दगीता
अध्याय १०: श्लोक ६ )
अर्थ: श्री कृष्ण
म्हणतात हे अर्जुना सात महर्षी जन आणि
त्यांच्याही पूर्वी झालेले चार सनकादिक तसेच स्वायंभुवादी चौदा मनु हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वंजन माझ्या संकल्पाने उत्पन्न झालेले आहेत आणि जगात
यांच्याच ह्या सर्व प्रजा आहेत.
आयुधपूजन
कौरवांनी
द्यूताच्या खेळात पांडवाना हरविल्यानंतर पांडवाना १४ वर्ष वनवास व त्यातील एक वर्ष
अज्ञातवासात घालवावे लागले. या काळात पांडवांचे वास्तव्य विराटनगरीत होते. पुढे
जेव्हा विराट राजाच्या गाई कौरवांनी पळविल्या तेव्हा पांडवानी युद्ध करून त्या गाई
विराटराजाला परत मिळविण दिल्या अशी कथा आहे. अज्ञातवासात जाण्यापूर्वी पांडवानी
आपली शस्त्रे शमीच्या झाडाच्या ढोलीत लपविली होती. तीच शस्त्रे त्यांनी या युद्धात
वापरली. म्हणून या दिवशी शमीच्या वृक्षाची व शस्त्रांची पूजा करतात.
रवि चित्रा नक्षत्री प्रवेश
१२:५५ ला रवि चित्रा नक्षत्रात
प्रवेश करत आहे. रविचे मृग नक्षत्र ते हस्त नक्षत्र
संक्रमण हा काळ भारतात पावसाळ्याचा मुख्य काळ समाजाला जातो.
रविचे
नक्षत्र : चित्रा
चंद्र
नक्षत्र: उत्तराषाढा
वाहन गाढव
रवि
नक्षत्र प्रवेशाच्या वेळी चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे यावरून वाहन ठरते. सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत मोजावे, त्यास ९ ने भागून बाकी किती राहते
त्याप्रमाणे वाहन ठरते. बाकी ८. म्हणून वाहन गाढव आहे.
स्त्री-पुरुष-नपुंसक नक्षत्रे : स्त्री-पुरुष
सूर्य
नक्षत्र स्त्री संज्ञक व चंद्र नक्षत्र पुरुष संज्ञक आहे.
सूर्य-चंद्र
सूर्य
सूर्य संज्ञक व चंद्र नक्षत्र चंद्र संज्ञक नक्षत्र आहे.
अमृतयोग
१९:४० नंतर सोमवारी श्रवण
नक्षत्र असल्यामुळे अमृतयोग होत आहे.
हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – हस्त
|
सोमवार – मृग / श्रवण
|
मंगळवार – अश्विनी
|
बुधवार – अनुराधा
|
गुरुवार – पुष्य
|
शुक्रवार – रेवती
|
शनिवार – रोहिणी
|
|
हा सामन्यात:
सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
|
विवाहास वर्ज
|
शनिवार – रोहिणी
|
प्रयाणास वर्ज
|
मंगळवार – अश्विनी
|
गृहप्रवेशास वर्ज
|
मृत्यू योग
१९:४० पर्यंत सोमवारी
उत्तराषाढा नक्षत्र असल्यामुळे मृत्यूयोग होत आहे.
हा
योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
|
सोमवार – उत्तराषाढा
|
मंगळवार – शततारका
|
बुधवार – अश्विनी
|
गुरुवार – मृग
|
शुक्रवार – आश्लेषा
|
शनिवार – हस्त
|
|
हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो.
असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने वंग प्रांतात पहिला जातो.
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने वंग प्रांतात पहिला जातो.
२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष
रहात नाही.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment