Wednesday, 30 September 2015

दिनविशेष - १ ऑक्टोबर २०१५

तिथी
 भाद्रपद कृ. ४ (१८:५६)
वार
 गुरुवार
नक्षत्र
 भरणी (१०:०७)
योग
 वज्र (२५:१७)
करण
 बव (०८:१४), कौलव (२९:४६)

संकष्टी चतुर्थी

पुणे चंद्रोदय: २१:१६
ही चतुर्थी विघ्नहर्त्याची म्हणून म्हणता या दिवशी सर्व दिवसभर उपास करावा. रात्री चंद्रोदयानंतर मधयुक्त भोजन करावे. ब्राह्मणास मधाचे दान करावे व त्यास भोजन घालून मग आपण भोजन करावे . यायोगे जो चालतो त्याची सकल अभिष्टे साधतात व तो प्रसाद पावतो.
श्रीगणपतीच्या व्रतांपैकी हे दर महिन्यास येणारे एक संकटनाशक, महासिद्धिदायक असे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या वद्य पक्षात जी चतुर्थी असते, त्या चतुर्थीस 'संकष्टी -चतुर्थी ' असे म्हण्तात. या दिवशी दिवसभर उपवास करावयाचा असतो. रात्रौ चंद्रदर्शनानंतर गणपतीची षोडशोपचारे पूजा करावी व त्यानंतर चंद्राची पूजा करुन त्याला व चतुर्थी तिथीला अर्घ्य द्यावे, अशी पद्धत आहे. श्रीगणपती ही विघ्ननाशक देवता असल्याने हा या व्रतप्रभावाने ती प्रसन्न होते आणि सर्व विघ्नांचा नाश होतो, असे महात्म्य आहे. या दिवशी चंद्रदर्शनानंतर चंद्राची पूजा करुन पारणे करावयाचे असते; हे ह्या व्रताचे मुख्य अंग आहे. या दिवशी संध्याकाळी आंघोळ करुन श्रीगणपतीच्या पूजेची तयारी करून घ्यावी. पुजास्थानी घरातील गणेशमूर्ती असेल तर ती ठेवावी. नसल्यास सुपारी अक्षतापुंजावर ठेवून तिची गणपती म्हणून पूजा करावी. अथर्वशीर्षाची २१ आवर्तने करावीत. पूजा षोडशोपचारांनी पंचामृतअभिषेकासह करावी. आवर्तनाच्या प्रत्येक वेळी
'श्रीविघ्नविनायकदेवताभ्यो नमः '
असे म्हणावे. प्रारंभी संकल्प करताना 'अमुक संकटनाशनार्थ' असे म्हणून त्या संकटाचा उल्लेख करावा.चंद्राला अर्घ्य द्यावा. त्याच्या दिशेने गंध, फूल,अक्षता उडवाव्या व नमस्कार करावा. चतुर्थी तिथीला अर्घ्य ताम्हनात द्यावा व शेवटी महानैवेद्य दखवून पारणे करावे. कथा ऐकावी. यायोगे सर्व संकटाचा नाश होतो, व गणेशकृपा होते, असा अनुभव आहे.
मंगळवारी येणार्‍या चतुर्थीला 'अंगारकी संकष्टी ' म्हणतात. हा एक महान योग आहे. हे संकष्टीचे व्रत यथासांग करणार्‍यास वर्षातील सर्व चतुर्थी केल्याचे पुण्य मिळते. यथाविधी व षोडशोपचारांनी गणपतीचे पूजन केल्यानंतर चंद्रोदय होताच चतुर्थी तिथीस, चंद्रास आणि श्रीगजाननास अर्घ्यप्रदान करावे. गजाननाची करुणा भाकावी. या व्रताच्या प्रभावाने साधकाची सर्व विघ्ने, संकटे दूर होतात. त्यास सर्व ऐहिक सुखे प्राप्त होऊन मंगलमूर्तीचे दर्शन होते, साक्षात्कार होतो, अशी लोकांत श्रद्धा आहे.
या दिवशी श्राद्धतिथी असेल तर ब्राह्मणभोजन घालून स्वत: भोजन हुंगून ते गाईस घालावे. रात्री चंद्रोदय झाल्यावर आपण जेवावे.

अनंत तृतीया

हे व्रत भाद्रपद, वैशाख किंवा मार्गशीर्ष या मासांच्या चतुर्थीपासून एक वर्षपर्यंत व्रतकाल. व्रताची देवता गौरी असून प्रत्येक मासी वेगवेगळ्या फुलांनी तिची पूजा करतात.

घबाड

१०:०७ नंतर १८:५६ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: हस्त
चंद्र नक्षत्र : कृत्तिका
तिथी: १५+४ = १९
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १८
१८ x ३ = ५४
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १५+४ = १९ तिथी मिळवू : ५४+१९ = ७३
आता ७ ने भागू  ७३ / ७ = १० ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

यमघंट योग

१०:०७ नंतर गुरुवारी कृत्तिका नक्षत्र असल्यामुळे होणारा यमघंट योग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Saturday, 26 September 2015

दिनविशेष - ३० सप्टेंबर २०१५

तिथी
 भाद्रपद कृ. ३ (२१:४३)
वार
 बुधवार
नक्षत्र
 अश्विनी (१२:२१)
योग
 व्याघ्रात (०८:१४), हर्षण (२८:३३)
करण
 वणिज (११:१८)

बृहद् गौरी (डोरली व्रत)

एक काम्य स्त्रीव्रत. भाद्रपद वद्य तृतीया ही व्रताची तिथी होय. याचा विधी असा - फळाफुलांनी युक्त असा बृहती (रिंगणी) चा वेल मुळासकट आणून तो वेळूच्या वेदीत पुरतात. त्याच्यापुढे पंचसूत्री दोरा ठेवतात. मग रात्री चंद्रोदय झाल्यानंतर पाच सुवासिनींसह त्या वेलाला गौरी मानून, त्याची पूजा करतात. पूजेनंतर तो दोरा गळ्यात बांधून चंद्राची पूजा करतात. त्याला कणकेच्या लाडवांचा नैवेद्य दाखवतात. त्यांतले अर्धे लाडू ब्राह्मणाला देतात. तसेच, कणकेची रिंगणी एवढी फळे करून त्याची वायने देतात.
पाच वर्षे उद्यापन करून त्याचे उद्यापन करतात. त्यावेळी चौसष्ट बियांनी युक्त असे रिंगणीएवढे सुवर्णफल तयार करून ते गौरीला अर्पण करतात. ब्राह्मण-सुवासिनींना भोजन घालतात.

कजरी तृतीया

भाद्रपद वद्य तृतीयेस उत्तर प्रदेशातल्या स्त्रिया कजरीची पूजा करतात. या दिवशी गहू, चणे व तांदूळ यांच्या पिठात तूप, साखर वगैरे घालून त्याचे गोड पदार्थ बनवितात. म्हणून या व्रताला हे लोक सातुडी (सत्तू = पीठ ) तीज किंवा सतवा वीज असे म्हणतात.
उत्तर प्रदेशात या दिवशी स्त्रिया झाडाला झूले टांगतात व त्यावर झोके घेत कजरीची गीते गातात.

भरणी श्राद्ध

भरणीश्राद्ध अपिंडक षड्‌देवतांच्या उद्देशाने सांकल्पविधीने करावे. याला धूरिलोचन अथवा पुरूरवार्द्रव हे देव घ्यावे. भरणी श्राद्ध काम्य आहे. गयाश्राद्धाचे फल इच्छिणाराने प्रतिवर्षी करावे.

दग्धयोग

२१:४३ पर्यंत बुधवारी तृतिया असल्यामुळे दग्धयोग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी

मृत्यू योग

१२:२१ पर्यंत बुधवारी अश्विनी नक्षत्रामुळे होणारा मृत्यू योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त

भद्रा


११:१८ नंतर २१:४३ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

दिनविशेष - २९ सप्टेंबर २०१५

तिथी
 भाद्रपद कृ. २ (२४:५९)
वार
 मंगळवार
नक्षत्र
 रेवती (१५:००)
योग
 ध्रुव (१२:१५)
करण
 तैतिल (१४:४५)

अमृतयोग

१५:०० नंतर गृह प्रवेशास वर्ज असा मंगळवारी अश्विनी नक्षत्र असल्यामुळे अमृतसिद्धी योग होतो. हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो. 
रविवार हस्त
सोमवार मृग / श्रवण
मंगळवार अश्विनी
बुधवार अनुराधा
गुरुवार पुष्य
शुक्रवार रेवती
शनिवार रोहिणी

हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.

गुरुवार – पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार – रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार – अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

दिनविशेष - २८ सप्टेंबर २०१५

तिथी
 भाद्रपद पौर्णिमा (०८:२१), भाद्रपद कृ.  १ (२८:३५)
वार
 सोमवार
नक्षत्र
 उत्तराभाद्रपदा (१७:५५)
योग
 वृद्धी (१६:२७)
करण
 बालव (१८:२७)

इंद्रपौर्णिमासी

भाद्रपद पौर्णिमेस हे व्रत करतात. या दिवशी उपवास, तीस दंपतींना भोजन व वस्त्रालंकार देणे, हा या व्रताचा विधी आहे.
फल - मोक्ष.

शिवपार्वती-पूजन

भाद्रपद पौर्णिमेला ही पूजा करतात. सकाळी स्नान झाल्यावर शिवपार्वतीच्या मूर्तीची पूजा करावी. रात्री गुणगान, कीर्तन करावे, जागरण करावे. ब्राह्मणभोजन व दक्षिणा द्यावी.

भागवत साप्ताह समाप्ती

२२ तारखेला सुरु झालेल्या भागवत साप्ताहीची समाप्ती होत आहे.

संन्यासिनां चातुर्मास्य समाप्ति

या दिवशी संन्यासव्रत घेतलेल्यांचा चातुर्मास समाप्त होत आहे. व्यासपूजनाच्या दिवशी याची सुरवात झाली होती.

ग्रस्तास्त चंद्रग्रहण

ग्रहण स्पर्श: सकाळी ६:३७
ग्रहण मध्य: सकाळी ८:१७
ग्रहण मोक्ष: सकाळी ९:५८
हे ग्रहण खग्रास असले तरी भारतामधील फक्त पश्चिमेकडील गुजरात व राजस्थान मधील काही प्रदेशात खंडग्रास दिसणार आहे. हे ग्रहण ग्रस्तास्त असल्यामुळे ग्रहण ग्रस्त झालेले चंद्रबिंब अस्तास जाईल. ग्रहण मध्य व ग्रहण मोक्ष अवस्था दिसणार नाही.

ग्रहण दिसणारे प्रदेश

भारत मध्य आशिया खंड, आफ्रिका खंड, दक्षिण व उत्तर अमेरिका

पुण्यकाल

ग्रहण स्पर्शापासून चंद्रास्त (सूर्योदय) होईपर्यंतचा काळ पुण्यकाल आहे.

वेधारंभ

हे ग्रहण रात्रीच्या चौथ्या प्रहरात लागते. म्हणून २७ सप्टेंबर रोजी रविवारच्या सुर्यास्तापासून ग्रहणाचे वेध पाळावेत. वेधकाळात भोजन करू नये. स्नान, देवपूजा, जपजाप्य, श्राद्ध हि कर्मे करता येतील. बाल, आजारी, अशक्त व्यक्ती व गर्भवती स्त्रियांनी रविवारी रात्री ९ पासून ग्रहणाचे वेध पाळावेत.

महालयारंभ

मनुष्यमात्रावर देव-ऋण, ऋषि-ऋण आणि पितृ-ऋण अशी तीन ऋणे असतात, असे शास्त्रात सांगितले आहे. यांपैकी पितृऋण आपण श्राद्ध करून फेडीत असतो. कारण ज्या मातापित्यांनी आयुरारोग्याच्या आणि सुखसौभाग्याच्या अभिवृद्धीसाठी अपार कष्ट घेतले, त्यांच्या ऋणामधून अल्पांशाने तरी मुक्त होण्याचा आपण प्रयत्‍न नाही केला, तर आपण जन्माला येऊन व्यर्थ होय. वर्षभरातून केवळ एकदाच त्यांच्या मृत्युतिथीला सर्वांस सहज प्राप्त होणार्‍या जल, तीळ, तांदूळ, कुश (दर्भ) आणि पुष्प एवढ्या साधनांनी त्यांचे श्राद्ध घालावयाचे, गोग्रास वाढावयाचा आणि यथाशक्ती एक तीन, पाच ब्राह्मणांना भोजन घालावयाचे, एवढे केल्याने आपल्या वरचा पितृऋणभार हलका होतो. म्हणून अशा सहजसाध्य होणार्‍या गोष्टीची आपण उपेक्षा करू नये. यासाठी ज्या महिन्याच्या त्या तिथीस आपल्या मातापितरांचा मृत्यू झाला असेल, त्या महिन्याच्या त्या तिथीस श्राद्धदी कर्म करणे, शिवाय भाद्रपद व. पक्षात (महालय पक्षात ) सुद्ध त्याच तिथीला श्राद्ध, तर्पण, गोग्रास आणि ब्राह्मणभोजनादी करणे अथवा करविणे आवश्यक आहे. हे श्राद्ध, पितृत्रयी - पिता, पितामह, प्रपितामह; मातृत्रयी - माता, पितामही, प्रपितामही, सापत्‍नमाता, मातामह, मातृपितामह, मातृप्रपितामह, मातामही, मातृपितामही, मातृपतिपामही, पत्‍नी, पुत्र, कन्या, पितृव्य, मातुल, बंधू, आत्या, मावशी, बहीण, पितृव्य - पुत्र, जावई, बहिणीचा मुलगा, सासरा, सासू, आचार्य, उपाध्याय, गुरू, मित्र, शिष्य या सर्वांच्या उद्देशाने करायचे असते. असे केल्याने मातापितरांच्या मृत्युतिथीला मध्यान्हसमयी मुलाने पुन्हा स्नान करून श्राद्धादी कर्म करावे आणि ब्राह्मणभोजन घालून स्वत: भोजन करावे. ज्या स्त्रिला पुत्र नाही, तिने आपल्या पतीचे श्राद्ध त्या तिथीला स्वत: केले तरी चालते. भाद्रपद पौर्णिमेपासून भाद्रपद अमावस्येपर्यंत सोळा दिवस पितृतर्पण आणि तिथीच्या दिवशी श्राद्ध अवश्‍य करावे. याप्रमाणे केल्याने 'पितृव्रत' यथासांग पूर्ण होते.
या पक्षात पितर यमलोकातून आपल्या कुटुंबीय माणसांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत आहे. योग्य तिथीवर महालय करणे अशक्य झाल्यास पुढे
'यावद् वृश्‍चिकदर्शनम्
म्हणजे सूर्य वृश्‍चिकराशीला जाईपर्यंत कोणत्याही योग्य तिथीला केला तरी चालतो. महालयासाठी आप्तेष्टांनाही भोजनाचे निमंत्रण द्यावे.

आरोग्यव्रत

भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून आश्‍विन पौर्णिमेपर्यंत प्रतिदिनी कमलांनी अनिरुद्धमुर्तिची पूजा करावी. उद्यापनाच्या आधी तीन दिवस उपवास, होम करावा व ब्राह्मणभोजन घालावे.
फल - आरोग्य व सौंदर्य यांचा लाभ.

गजगौरी व्रत (हादगा-भोंडला)

नवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात.

इष्टि

इष्टि  म्हणजे यज्ञ.
यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.

क्षयदिन

ज्या तिथीला कोणताही सूर्योदय होत नाही ति क्षय तिथी असते.
लागोपाठच्या दोन सूर्योदयाच्या वेळी एकचतिथी असेल तर तिला तिथी वृद्धी म्हणतात.

क्षय तिथी, वृद्धी तिथी, कृ. १३, कृ १४, अमावास्या व शु. १ या सहा तिथी शुभ कार्यासाठी पूर्णपणे अशुभ सांगितलेल्या आहेत.

संदर्भ
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट