तिथी
|
पौष कृष्ण ३ (९:५५)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
पूर्वाफाल्गुनी (२५:५८)
|
योग
|
शोभन (२०:००)
|
करण
|
बव (२२:५३)
|
संकष्टी चतुर्थी
(पुणे चंद्रोदय: २१:१८)
ही वरदमूर्ती चतुर्थी आहे. या दिवशी गोमूत्र पिऊन दिवसभर उपवास करावा.
सायंकाळी श्रीवरदमूर्ती गणेशाची पूजा करावी व आरती, मंत्रपुष्प करून गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. ब्राह्मणभोजन घालून मग आपण
जेवावे. यायोगे एकाक्षरी मंत्राची सिद्धी प्राप्त होते. असे हे सर्वसिद्धिविनायक
व्रत आहे. हे व्रत जो आचरील व कथा श्रवण करील, त्याचे निरंतर कल्याण होईल.
श्रीगणपतीच्या व्रतांपैकी हे दर महिन्यास येणारे एक संकटनाशक, महासिद्धिदायक असे
व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या वद्य पक्षात जी चतुर्थी असते, त्या चतुर्थीस 'संकष्टी -चतुर्थी ' असे म्हण्तात. या
दिवशी दिवसभर उपवास करावयाचा असतो. रात्रौ चंद्रदर्शनानंतर गणपतीची षोडशोपचारे
पूजा करावी व त्यानंतर चंद्राची पूजा करुन त्याला व चतुर्थी तिथीला अर्घ्य द्यावे, अशी पद्धत आहे.
श्रीगणपती ही विघ्ननाशक देवता असल्याने हा या व्रतप्रभावाने ती प्रसन्न होते आणि
सर्व विघ्नांचा नाश होतो, असे महात्म्य आहे. या दिवशी चंद्रदर्शनानंतर चंद्राची पूजा करुन पारणे
करावयाचे असते; हे ह्या व्रताचे मुख्य अंग आहे. या दिवशी संध्याकाळी आंघोळ करुन श्रीगणपतीच्या
पूजेची तयारी करून घ्यावी. पुजास्थानी घरातील गणेशमूर्ती असेल तर ती ठेवावी.
नसल्यास सुपारी अक्षतापुंजावर ठेवून तिची गणपती म्हणून पूजा करावी. अथर्वशीर्षाची
२१ आवर्तने करावीत. पूजा षोडशोपचारांनी पंचामृतअभिषेकासह करावी. आवर्तनाच्या
प्रत्येक वेळी
'श्रीविघ्नविनायकदेवताभ्यो नमः ।'
असे म्हणावे. प्रारंभी संकल्प करताना 'अमुक संकटनाशनार्थ' असे म्हणून त्या संकटाचा उल्लेख
करावा.चंद्राला अर्घ्य द्यावा. त्याच्या दिशेने गंध, फूल,अक्षता उडवाव्या व नमस्कार करावा.
चतुर्थी तिथीला अर्घ्य ताम्हनात द्यावा व शेवटी महानैवेद्य दखवून पारणे करावे. कथा
ऐकावी. यायोगे सर्व संकटाचा नाश होतो, व गणेशकृपा होते, असा अनुभव आहे.
दग्ध योग
९:५५ पर्यंत बुधवारी तृतीया
तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार यांच्या
संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग
होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
|
घबाड
२५:५८ नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: श्रवण
चंद्र
नक्षत्र : उत्तराफाल्गुनी
तिथी:
१५ + ४ = १९
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १८
१८
x ३ = ५४
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १९ तिथी
मिळवू : ५४ + १९ = ७३
आता
७ ने भागू ७३ / ७ = १० ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
भद्रा
९:५५ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.
विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
संकष्टी चतुर्थीची कथा :
ReplyDeleteपूर्वी द्वारकेत सत्रजित नावाचा एक मोठा राजा होवून गेला. सत्रजित सूर्याचा मोठा भक्त होता त्याच्या उपासनेने. प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य स्यमंतक मणी दिला. त्या मण्यात सूर्याचे तेज होते,. या मण्यामुळे राजास दररोज आठ भार सोने प्राप्त होई. त्यामुळे सत्राजित अभिमानी झाला.
सत्रजितची कन्या सत्यभामा हि अत्यंत रूपवती व सर्व कलासंपन्न होती ती कृष्णावर मनोमन प्रेम करायची त्यामुळे सत्राजित श्रीकृष्णाचा द्वेष करीत असे. सत्राजिताने सात्यकी बरोबर सत्यभामेचा विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला असता सात्यकीने विवाहास नकार दिला त्याला ठावूक होते कि सत्यभामेचे कृष्णावर प्रेम आहे,त्यामुळे सत्रजित श्रीकृष्णाचा अधिकच द्वेष करू लागला.
पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधु प्रसंनजित हा स्यमंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याला ठार मारले व खावून टाकले पण तो दिव्यमणी सिहाच्या गळ्यात अडकला पुढे त्या सिंहास जांबुवंताने ठार केले व तो स्यमंतक मणी हस्तगत केला.
इकडे बंधू प्रसंनजित व स्यमंतक मणी दोन्ही गायब झाल्याने सत्रजितला कृष्णाचा संशय आला त्याने कृष्णावर मणी चोरल्याचा आरोप केला. चोरीच्या आरोपाने श्रीकृष्ण दुखी झाला व आपल्यावरील चोरीचा आळ दूर करण्यासाठी कृष्ण अरण्याकडे निघाला. जंगलात एका गुहेतून दिव्य प्रकाश येत होता सैन्याला बाहेर थांबवून कृष्ण एकटाच गुहेत शिरला ती गुहा जांबुवंताची होती जम्बुवाताने कृष्णावर हल्ला केला. त्या दोघांचे युद्ध एकवीस दिवस चालले होते. जांबुवंत हा ब्रम्हाचा पुत्र होता, लंकाविजयात त्याने रामाला साथ दिली होती त्याला आशीर्वाद होता कि श्रीकृष्णा शिवाय त्याला युद्धात कोणी हरवू शकत नव्हते,
जम्बुवान्ताला समजले कि तो प्रत्यक्ष प्रभूंशी युध्द करत आहे तेव्हा तो कृष्णाला शरण गेला इकडे गोकुळात नंद-यशोदेला या युद्धाची वार्ता कळली. तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले. त्यांनी संकटहर्त्या श्रीगणेशाची प्रार्थना केली व संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले.
श्रीगणेशाच्या कृपाप्रसादाने श्रीकृष्णास विजयप्राप्ती झाली. जांबुवंताने स्यमंतक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली. त्यांना घेवून श्रीकृष्ण द्वारकेत परतला त्याने सत्राजिताला मणी परत केला, तेव्हा सत्रजित लज्जित झाला सत्रजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागितली व त्याने आपली कन्या सत्यभामेशी श्रीकृष्णाचा विवाह लावून दिला् व अशा प्रकारे संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला.
दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. या व्रतामुळे संकटहर्त्या श्रीगणेशाची कृपा लाभते. भक्तांची संकटे दूर होतात. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात.दिवसभर उपोषण करुन, रात्रौ चंद्रोदयाच्या वेळी श्रीगणपतीची पूजा करुन, चंद्रदर्शन घेऊन उपोषण सोडावयाचे. असे हे व्रत असते.
ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण व जांबुवंत यांच्यात युध्द झाले ते ठिकाण म्हणजे जांबुवंतगढ मु.जामखेड ता. अंबड जि. जालना तसेच ज्या ठिकाणी जांबुवंती व भगवान श्रीकृष्ण यांचा विवाह झाला ते ठिकाण म्हणजे नववड संस्थान, कडेठाण ता. पैठण जि. औरंगाबाद व महालक्ष्मी मंदिर, कडेठाण या ठिकाणी त्यांनी स्यमंतक पुजन केले व पैठण येथे जांबुवंतीला स्त्री रुपांतरीत करुन भगवान श्रीकृष्ण द्वारकेत गेले.
ReplyDelete