तिथी
|
भाद्रपद कृष्ण २ (१८:२२)
|
वार
|
रविवार
|
नक्षत्र
|
रेवती (२४:५५)
|
योग
|
वृद्धि (१६:३१)
|
करण
|
तैतिल (७:५९), वणिज (२८:४४)
|
बृहद् गौरी (डोरली व्रत)
एक काम्य
स्त्रीव्रत. भाद्रपद कृष्ण तृतीया ही व्रताची तिथी होय. याचा विधी असा -
फळाफुलांनी युक्त असा बृहती (रिंगणी) चा वेल मुळासकट आणून तो वेळूच्या वेदीत पुरतात.
त्याच्यापुढे पंचसूत्री दोरा ठेवतात. मग रात्री चंद्रोदय झाल्यानंतर पाच
सुवासिनींसह त्या वेलाला गौरी मानून, त्याची पूजा करतात.
पूजेनंतर तो दोरा गळ्यात बांधून चंद्राची पूजा करतात. त्याला कणकेच्या लाडवांचा
नैवेद्य दाखवतात. त्यांतले अर्धे लाडू ब्राह्मणाला देतात. तसेच, कणकेची रिंगणी एवढी फळे करून त्याची वायने देतात.
पाच वर्षे
उद्यापन करून त्याचे उद्यापन करतात. त्यावेळी चौसष्ट बियांनी युक्त असे रिंगणीएवढे
सुवर्णफल तयार करून ते गौरीला अर्पण करतात. ब्राह्मण-सुवासिनींना भोजन घालतात.
द्वितीया श्राद्ध
श्राद्धतिथी द्वितीया असेल
तर या दिवशी महालय करावा.
भद्रा
२८:४४ नंतर भद्रा म्हणजे
विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या
वेळी भागान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या
देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही
गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ
झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा
पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे
दोन्ही पक्षात चर चर वेळा भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ
व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन
व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु
व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे
असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता
ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी
असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा
दोष माणू नये.
योग्य व वर्ज कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग,
अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट
इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ.
कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व
फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.
भद्रा मुख व पृच्छ:
ज्या तिथीत भद्रा असेल त्या
आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. ते अत्यंत अशुभ होय.
तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून
सर्व कार्यास प्रशस्त मानावे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment