भाद्रपद शुल्क षष्ठी हा
दिवस कार्तिकेय दर्शनासाठी उत्तम मनाला जातो. या दिवशी कार्तिकेयाचे दर्शन
घेतल्यास ब्रह्महत्या इ. पापांपासून मुक्ती मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात
असे मानले जाते.
भाद्रपद शुध्द
षष्ठी ज्याला आपण सूर्यषष्ठी म्हणतो त्या दिवशी भगवान कार्तिकेय यांचे दर्शन घेणे
क्रमप्राप्त आहे. अनेक लोक मोठया प्रमाणावर भगवान कार्तिकेयाचे दर्शन घेतात परंतु
दर्शन घेण्यापूर्वी घरातील देवतांना पान वीडा (दोन खाऊची पाने, 1 सुपारी, 1/2/5/10 रुपयाचे चलनातील
धातूचे नाणे) ठेवून - आज सुर्यषष्ठीच्या दिवशी आम्ही देव सेनापती भगवान कार्तिकेय
यांचे दर्शन घेण्याकरिता जात आहोत तरी आमच्या मार्गातील सर्व अडचणी, अडथळे पूर्णपणे दूर करुन आमच्या प्रत्येक कार्यामध्ये यश
येण्याकरिता तुम्ही आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा - अशी प्रार्थना करावी आणि
नंतरच घरातून बाहेर पडावे.
त्यानंतर भगवान कार्तिकेय मंदिरामध्ये नारळाचे
पाणी, पांढरे तीळ, मोराचे पीस, दर्भ, रुद्राक्ष, कमंडलू, मोती, पोवळा, सोने यापैकी आपणास जे
शक्य असेल ते दान कार्तिकेयाचे पायावर अर्पण करण्याकरिता घेऊन जाऊन तेथेही पान
वीडा (दोन खाऊची पाने, 1 सुपारी, 1/2/5/10 रुपयाचे चलनातील धातूचे नाणे) ठेवून –
आज
सुर्यषष्ठीच्या दिवशी आम्ही आपले दर्शन घेण्याकरिता जात आहोत तरी आमच्या मार्गातील
सर्व शारिरीक, आर्थिक, मानसिक, बौध्दीक, व्यावसायीक, कोर्टकेस, विरोधकांमार्फत करण्यात
येणारे विविध अभिचार, उच्चाटन प्रयोग तसेच स्मशान, कबरस्तान यांचेशी संबंधित बाहेरचा भौतिक, आधिभौतिक, दैवीक, आधिदैवीक त्रास तसेच सर्व अडथळे पूर्णपणे नष्ट करुन आमच्या
प्रत्येक कार्यामध्ये यश येण्याकरिता तुम्ही आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा, तुमची वाट शक्यतो कधी चूकणार नाही – या प्रमाणे
प्रार्थना करावी.
No comments:
Post a Comment