तिथी
|
भाद्रपद शुक्ल १४ (२७:१६)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
धनिष्ठा (९:१०)
|
योग
|
धृति (२७:०७)
|
करण
|
गरज (१६:२५)
|
अनंत चतुर्दशी / अनंतव्रत
हे व्रत भाद्रपद
शुक्ल चतुर्दशी दिवशी करतात. यासाठी उदयव्यापिनी तिथी घेतात. पौर्णिमायुक्त असेल
तर फल अधिक वाढते. कथेच्या अनुरोधाने जर मध्याह्नपर्यंत चतुर्दशी असेल तर उत्तम
मानतात. स्वत:स काही अडचण असेल तर ब्राह्मणाकडून पूजा करावी. कारण हे व्रत इतर
कोणत्याही सोयीच्या दिवशी करता येत नाही. आणि या व्रताचा लोप होत. नाही.
व्रत करणार्याने
त्या दिवशी प्रात:स्नान करून
'ममाखिलपापक्षयपूर्वक शुभफलवृद्धये
श्रीमदनन्तप्रीतिकामनया अनंतव्रतमहं करिष्ये ।'
असा संकल्प सोडून
जागा सुशोभित करावी. चौरंगास कर्दळी लावून त्यावर साक्षात नाग अगर दर्भाचा बनवलेला
सप्तफणांचा शेषस्वरूप अनंत याची प्रतिष्ठापना करावी. त्याच्यापुढे १४ गाठींचा
रेशमाचा अनंतदोरक ठेवून आम्रपल्लवांसह पंचामृतादी धूप, दीप, गंध,
फूल वगैरे षोडशोपचारांनी
पूजा करून नैवेद्य अर्पण करावा.
"नमस्ते
देव देवेश नमस्ते धरणीधर ।
नमस्ते सर्व
नागेन्द्र नमस्ते पुरुषोत्तम ॥"
असा श्लोक
म्हणून नमस्कार करावा, व
'न्यूनातिरिक्तानि परिस्फुटानि यानीह कर्माणि
मया कृतानि ॥
सर्वाणि चैतानि
मम क्षमस्व प्रयाहि तुष्ट: पुनरानमनाय ॥'
या मंत्राने
विसर्जन करावे आणि
'दाता च विष्णुर्भगवाननन्त: प्रतिगृहीता च स एव
विष्णु: ।
तस्मात्त्वया
सर्वमिदं ततं च प्रसीद देवेश वरान् ददस्व ॥'
या मंत्राने वाण
द्यावे बिनमिठाचे पदार्थ खावेत. .
कदलीव्रत
भाद्रपद शुक्ल चतुर्दशी
दिवशी केळी (कर्दळी ) च्या झाडाखाली बसुन अनेक प्रकारच्या फळा - फुलांनी व धूप -
दीप दाखवून त्याची पूजा करावी. सप्त धान्य, रक्तचंदन, घृतदीपक, दही, दूध अक्षता, वस्त्र, तुपात तळलेला नैवेद्य, जायफळ, सुपारी व प्रदक्षिणा यांनी अर्चना करून
'चिन्तयेत्कदलीं नित्यं कदलै: कामदीपितै: ।
शरीरारोग्यलावण्यं
देहि देवि नमोऽस्तु ते ॥
अशी प्रार्थना
करावी. याप्रमाणे ३ अगर ४ महिने केल्यास त्या वंशात स्त्री पातकी निघत नाही व सर्व
पुत्रपौत्रादींसह सुदैवी व सदाचारिणी होतात.
पालीव्रत
भाद्रपद शुक्ल
चतुर्दशी दिवशी चारी वर्णांपैकी कुणीही कुलस्त्रीने जलाशयावर जाऊन अक्षता घेऊन
त्याचे मंडल करावे. त्यावर वरुणाची मूर्ती अथवा वारुण यंत्र स्थापन करावे. त्याची
गंध-फुलांनी पूजा करावी.
'वरुणाय नमस्तुभ्यं नमस्ते यादसां पते ।
अपांपते
नमस्तुभ्यं रसानां पतये नम: ॥'
या मंत्राने
अर्घ्य द्यावा आणि
'माक्लेदं मा च दौर्गन्ध्यं वैरस्यं मा
मुखेऽस्तु मे ।
वरुणो
वारुणीभर्ता वरदोऽस्तु सदा मम ॥'
अशी प्रार्थना
करून ब्राह्मणांना भोजन घालावे व मग स्वत: जेवावे.
भद्रा
२७:१६ नंतर भद्रा म्हणजे
विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या
वेळी भागान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या
देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही
गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ
झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा
पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे
दोन्ही पक्षात चर चर वेळा भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ
व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन
व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु
व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे
असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता
ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी
असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष
माणू नये.
योग्य व वर्ज कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग,
अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट
इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ.
कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व
फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.
भद्रा मुख व पृच्छ:
ज्या तिथीत भद्रा असेल त्या
आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. ते अत्यंत अशुभ होय.
तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून
सर्व कार्यास प्रशस्त मानावे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment