तिथी
|
भाद्रपद शुक्ल ४ (२१:०९)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
चित्रा (१९:४०)
|
योग
|
शुक्ल (८:२८)
|
करण
|
वणिज (०८:००)
|
श्री गणेश चतुर्थी
पार्थिव गणेश पूजन, चंद्रदर्शन निषेध, चंद्रास्त (२१:३३)
गणेशोत्सव गणेश
चतुर्थी म्हणजेच भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तिथीला साजरा करतात. घराघरांत आणि
सार्वजिनिक मंडळांत श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या दिवशी केली जाते. गणेश
चतुर्थीच्या दिवशी आणि त्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा व आरती केली
जाते. अनंतचतुर्दशीच्या दिवशी गणेश मूर्तींचे तलाव, नद्या, समुद्र यात विसर्जन होते.
या दिवशी
चंद्रदर्शन वर्ज मानले आहे. चंद्र दर्शन घेतल्यास खोटा आळ येतो. त्यामुळे याला
कलंकिनी चतुर्थी असेही म्हणतात.
कथा
एकदां गणपती
उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला. तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हासला. तें
पाहून गणपतीला चंद्राचा फ़ार राग आला. गणपतीने चंद्राला शाप दिला की "
आजपासून तुझें कोणी तोंड पाहणार नाही. जो कोणी पाहील त्यावर खोटा आळ येईल!"
शेवटी चंद्राने मोठे तप करुन श्रीगणपतीला प्रसन्न करुन घेतले. चंद्राच्या तपामुळे
व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. पण
वर्षातून एक दिवश " भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश
चतुर्थीच्या दिवशी " तुझे तोंड कोणी पाहणार नही आणि जो कोणी पाहील त्यावर
त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले.त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी
चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशीं माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने
काय करावे? तेव्हां गणपतीने सांगितले की , त्याने संकष्ट चतुर्थी व्रत" करावे, म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल.
गणेश चतुर्थीच्या
दिवशी चंद्र पाहिल्या मुळे श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा खॊटा आळ आला होता.
तो आळ कृष्णाने "संकष्ट चतुर्थी व्रत " केल्यामुळे गेला, अशी कथा आहे.
आबालवृद्ध
स्त्रीपुरुषांनी सर्वांनी करावयाचे , हे एक साधे , सोपे पण शीघ्र फ़लदायी व्रत आहे.श्रावण महिन्यातील संकष्ट
चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फ़लदयी व महत्वाची
मानतात.प्रत्येकाने निदान वर्षांतून या दोन तरी अवश्य कराव्या.
गणपतीच्या पूजेत २१ पत्री
भारतीय संस्कृतित
पूजेत वाहण्यात येणारी फुले, पाने यांना अनन्यसाधारण
महत्त्व आहे. विविध देवतेनुसार पूजा साहित्यामध्ये बदल बघावयास मिळतो. काही
दिवसांत गणेशाचे आगमन होणार आहे. गणपतीच्या पूजेत २१ पत्रीचा समावेश असतो.
या पत्रींचे औषधी
गुण आपण जाणून घेऊ यात.
१)
पिपंळ - याला 'बोधीवृक्ष' म्हणतात. गौतम बुध्दांना याच झाडाखाली आत्मज्ञान प्राप्त
झाले होत. हवा शुध्दकरण्यासाठी हे एकच झाड एअरकुलर सिस्टीमच्या पाचपट अधिक काम
करते. याच्या पानांत औषधी गुणधर्म असतात म्हणून आदिवासी भागात या पानांवर मुलांना
जेऊ घातले जाते. पिपंळाची लाख (राख) खडीसाखरेबरोबर दिल्यास चांगली झोप लागते.
२)
केवडा - ही वनस्पती समुद्र किनार्यावर मोठया
प्रमाणात आढळते. ही वनस्पती थायरॉईडच्या दोषावर गुणकारी ठरते.
३)
हादगा - हादग्याला आपण 'अगस्ती' म्हणूनही ओळखतो. याच्या फुलांची भ्ाजी छान लागतात. या
फुलात अनेक जीवनसत्वांचा खजिना आहे. हा वृक्ष मध्यम आकाराचा आहे.
४)
बोर - बोराच्या बियांचे चुर्ण चेहर्यांवर
लावल्यास पुटकुळया जातात. मध्यम आकाराचा हा काटेरी वृक्ष डोळे जळणे, तापावरील दाह यासाठी उपयुक्त ठरतो.
५)
मधुमालती - मधुमालती ही वेल तशी शहरात बंगल्यांमध्ये सहज
बघावयास मिळते. ही एक काष्ट वेल आहे. गुलाबी, पांढर्या, पिवळया रंगाची फुले व सदाहरित पाने हे त्याचे वैशिष्टय.
फुफ्फुसाचे विकार, त्वचारोग, सांधेदुखी, पोटातील कृमी कमी करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो.
६)
माका - पावसाळयात आढळणारी ही वनस्पती डोंगर - टेकडयांवर
नजर लावून तिचा शोध घ्यावा लागतो. माका रसायन आहे. रसायन म्हणजे कोणत्याही
प्रकारचा रोग होऊ न देणारे औषध. मूत्रपिंडाचा आजार, कावीळ, त्वचारोग, विंचूदंश आदी रोगांवर
माक्याचे औषध प्रभावी ठरते.
७)
बेलपत्र - शंकराचे बेलपत्र सर्वांना परिचित आहे. या
वनस्पतीचा उपयोग पोटातील जंतावर गुणकारी आहे. अतिसार, आव, धडधड, उष्णता आदींसाठी हिचा
उपयोग होतो.
८)
धोतरा - धोतर्याचा काळा, पांढरा, व राजधोतरा अशा तीन जाती आहेत. या वनस्पतीपासून अफ्रोपिन
नावाचे औषध काढतात. वेदनाशक म्हणून त्याचा उपयोग केला जातो. ही वनस्पती पडिक जागेत
उगविणारी विषारी वनस्पती आहे. काटेरी पांढर्या लांब नरसळ्यासारखे फूल दमा, कफ, संधिवात आदी रोगांवर उपयुक्त ठरते. या
वनस्पतींची रोपे शहरात रस्त्याच्या कडेला हमखास दिसतात.
९)
तुळस - ही वनस्पती चोवीस तास ऑक्सिजन देणारी आहे.
डासांना पळवून लावणारी तुळस जवळपास प्रत्येक घरात बघावयास मिळते. तुळशीत राम, कृष्ण असे दोन प्रकार असले तरी आणखी तीन चार इतर प्रकारही
आहेत. कफ, दम, सर्दी, कीटक दंश तसेच कॅन्सर सारख्या रोगांवर तुळशीचा रस औषध
उपयोगी पडतो.
१०)
दुर्वा - ही एक गवताच्या जातीची वनस्पती आहे. पांढरी
(श्वेत) आणि निळा (नील) या दोन जाती आहेत. पांढ-या दुर्वा गणेशाला प्रिय असते.
आपल्याकडे तिला 'हरळ' म्हणतात. नाकातून रक्त येणे, ताप, अंगातील दाह कमी करण्यासाठी दूर्वांचा रस अमृतासमान असतो.
दूर्वा रस्त्याच्या बाजूला,
बागेतही मिळतात.
११)
शमी - शमीला सुप्त 'अग्नीदेवता' असेही म्हणतात. त्यामुळे यज्ञाच्या ठिकाणी शमीची रवी
ठेवतात. हा वृक्ष कोरडया हवामानात वाढणारा आहे. त्वचारोग, दमा, मूत्रपिंड या आजारांवर शमी प्रभावी ठरते.
१२)
विष्णुकांता - या वनस्पतीला आपल्याकडे 'शंखपुष्पी' म्हणतात. बुध्दीवर्धक म्हणून ही वनस्पती
विद्यार्थी वर्गात लोकप्रिय आहेत. ब्रेन टॉनिक म्हणून अत्यंत उपयोगी आहे. निळसर
फुले येणारी ही वनस्पती जमिनीलगत उगविणारी आहे. या वनस्पतीचा उपयोग मानसिक
विकारावर औषध म्हणून केला जातो. नदीच्या बाजूला, डोंगर-टेकडया आदी
ठिकाणी ही आपण बघू शकतो.
१३)
आघाडा - ऋषीपंचमीच्या दिवशी महिला मुखमार्जनासाठी
त्याचा वापर करतात. आघाडा मुखरोग व दंतरोगावर उत्तम औषध आहे. ही वनस्पती पडिक
जागेत माळरानांवर बघावयास मिळते.
१४)
डाळिंब - आपल्याकडे आरक्ता आणि गणेश अशा दोन जाती
मोठयाप्रमाणात बघावयास मिळतात. देखणी फुले, काहीसे काटेरी
झुडूप आहे. याचा उपयोग जंतावर गुणकारी आहे. काविळीसाठीही उपयोग केला जातो.
१५)
डोरली - या रोपाला 'काटे रिंगणी' म्हणूनही ओळखतात. या वनस्पतीच्या पानवर देखील काटे असतात.
त्वचारोग, पोटातील विकार, मूत्ररोगांवर हे
झुडूप फायदेशीर ठरते. आदिवासी भागात हे झुडूप मोठ्या प्रमाणात आढळते.
१६)
देवदार - हा महाकाय वृक्ष पश्चिम घाट, हिमालयात आढळतो. या वृक्षाचे लाकूड अतिशय मजबूत असते. कफ, पडसे, संधिवात यासाठी याचा रस
फायदेशीर ठरतो. याची झाडे महाराष्ट्रात नाशिकजवळ पेठ, हरसूल भागात
देखील दिसतात.
१७)
कण्हेर - कण्हेरीची पाने व मुळाचा साठा औषधी आहे. परस
बागेतही हमखास दिसणारी वनस्पती एक विषारी झुडूप आहे. याच्या फुलांना सुगंध असतो.
वात विकारावरील महाविषारी तेलात हिचा वापर केला जातो.
१८)
मारवा - ही सुवासिक वनस्पती असून विविध प्रकारच्या
जखमा, भाजणे, किंवा कोणत्याही
कारणांमुळे त्वचेवर आलेल्या डागांसाठी ही वनस्पती उपयुक्त ठरते. नवीन संशोधनात तर
मारव्यापासून कर्करोगावर औषध तयार करण्यास यश आले आहे. ही वनस्पती घरात
कुंडीतदेखील लावता येते.
१९)
रूई - रुई या वनस्पतीला 'मांदार' म्हणूनही ओळखतात. ओसाड जागेत ही वनस्पती मोठया प्रमाणात
दिसते. हिला पांढर्या, जांभळया रंगाची फुले येतात. हत्तीरोगावर हे फार
उत्तम औषध आहे. तसेच कुष्ठरोगावर देखील त्याचे औषध प्रभावी ठरते. पांढरी रूई
गणेशाला अधिक प्रिय असते.
२०)
अर्जुन - हाडे जोडणारी वनस्पती म्हणून आदिवासी
पट्टयात हिला ओळखतात. या वृक्षाचा उल्लेख रामायणात देखील आढळतो. हृदयरोगावर ही
वनस्पती उपयोगी ठरते. या वनस्पतीत कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते.
२१)
जाई - या वनस्पतीला जास्मीन देखील म्हणतात. ही
वनस्पती शहरात मोठया प्रमाणात दिसते. तोंड आल्यावर जाईची पाने खातात, तसेच जुन्या जखमांवर जाईचा पाला लावला जातो.
जैन संवत्सरी (चतुर्थी पक्ष)
जैन संप्रदायातील
लोक भाद्रपद महिन्यात पर्यूषण पर्व साजरे करतात. श्वेताम्बर संप्रदायाचे पर्यूषण ८ दिवस असते तर दिगंबर संप्रदायाचे लोक १० दिवस पर्यूषण पर्व
साजरे करतात. त्यांस 'दसलक्षण' असेही म्हणतात.
शिक्षक दिन
डॉ. राधाकृष्णन
यांचा जन्मदिवस शिक्षक दिन (५ सप्टेंबर) म्हणून साजरा केला जातो. शिक्षक हा
सामाजाचा निर्माण कर्ता आहे. छोट्या बालकाचे देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून
परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षकाला कारायचे असते. राष्ट्रउभारणीच्या कार्यात
शिक्षकाचा मोठा वाटा असतो. डॉ. राधाकृष्णन यांनी एके ठिकाणी म्हटले आहे - "ज्या देशात
निस्वार्थी निरपेक्ष व सेवावृत्तीने कोणतेही कार्य होते तेंव्हा त्या देशातील
शिक्षकच खरे सन्मानाला पात्र होतात." आणि म्हणूनच त्यांच्या जन्मदिनी
शिक्षकांचा सन्मान केला जातो.
विश्वातील विविध
देशांमध्ये विविध दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. ५ ऑक्टोंबर हा जागतिक शिक्षक
दिन आहे.
देश
|
शिक्षक दिन
|
अर्जेन्टीना
|
११ सप्टेंबर
|
अल्बानिया
|
७ मार्च
|
ऑस्ट्रेलिया
|
ऑक्टोंबर मधील शेवटचा
शुक्रवार
|
ब्राज़ील
|
१५ ऑक्टोंबर
|
चिली
|
१६ ऑक्टोंबर
|
चीन(PRC)
|
१० सप्टेंबर
|
चेक गणराज्य
|
२८ मार्च
|
इक्वाडोर
|
१३ एप्रिल
|
अल साल्वाडोर
|
२२ जून
|
हांग कांग
|
१२ सप्टेंबर
|
हंगरी
|
जून महिन्याचा पहिला दिवस
|
भारत
|
५ सप्टेंबर
|
इंडोनेशिया
|
२५ नोव्हेंबर
|
ईरान
|
२ मे
|
मलेशिया
|
१६ मे
|
मेक्सिको
|
१५ मे
|
मंगोलिया
|
फेब्रुवारीचा पहिला weekend
|
पाकिस्तान
|
५ ऑक्टोंबर
|
पेरू
|
६ जुलै
|
फ़िलीपीन्स
|
५ ऑक्टोंबर
|
पोलैंड
|
१४ ऑक्टोंबर
|
रूस
|
५ ऑक्टोंबर
|
सिंगापुर
|
१ सप्टेंबर
|
दक्षिण कोरिया
|
१५ मे
|
ताइवान
|
२८ सप्टेंबर
|
थाईलैंड
|
१६ जानेवारी
|
तुर्की
|
२४ नोव्हेंबर
|
संयुक्त राज्य अमेरिका
|
६ मे
|
वियतनाम
|
२० नोव्हेंबर
|
भद्रा
०८:०० नंतर २१:१० पर्यंत
भद्रा म्हणजे विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या
वेळी भागान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या
देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही
गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ
झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा
पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे
दोन्ही पक्षात चर चर वेळा भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ
व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन
व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु
व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे
असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता
ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी
असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा
दोष माणू नये.
योग्य व वर्ज कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग,
अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट
इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ.
कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व
फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.
भद्रा मुख व पृच्छ:
ज्या तिथीत भद्रा असेल त्या
आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. ते अत्यंत अशुभ होय.
तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून
सर्व कार्यास प्रशस्त मानावे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment