तिथी
|
भाद्रपद शुक्ल पोर्णिमा (२४:३५)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
शततारका (७:३८), पूर्वा भाद्रपदा (२९:३९)
|
योग
|
शूल (२३:५०)
|
करण
|
विष्टि (१३:५८)
|
छायाकल्प चंद्रग्रहण
यावर्षी भाद्रपद
पौर्णिमेस १६ सप्टेंबऱला शुक्रवारी
छायाकल्प चंद्रग्रहण आहे.
नेहमी जसे
चंद्रग्रहण होत असते तसे हे ग्रहण नसून चंद्र हा रात्री १०.२५ ते उत्तर रात्री
२.२४ (१७ सप्टेंबरला पहाटे) पर्यंत
पृथ्वीच्या विरळ छायेत येत आहे म्हणून त्याला छायाकल्प चंद्रग्रहण असे संबोधिले
आहे.
धर्मशास्त्रानुसार
अशा छायाकल्प चंद्रग्रहणाचे वेध व इतर कोणतेही नियम पाळू नयेत. गर्भवतीनी सुद्धा
कोणतेही नियम पाळू नयेत.
प्रोष्ठपदी पोर्णिमा
तीन पिढ्या
पर्यंतचे श्राद्ध महालायात करतात.
मात्र त्या
आधीच्या तीन पिढ्यांचे श्राद्ध प्रोष्ठपदी
पौर्णिमेला केले जाते.
इंद्रपौर्णिमासी
भाद्रपद
पौर्णिमेस हे व्रत करतात. या दिवशी उपवास, तीस दंपतींना
भोजन व वस्त्रालंकार देणे, हा या व्रताचा विधी आहे.
फल - मोक्ष.
शिवपार्वती-पूजन
भाद्रपद पौर्णिमेला
ही पूजा करतात. सकाळी स्नान झाल्यावर शिवपार्वतीच्या मूर्तीची पूजा करावी. रात्री
गुणगान, कीर्तन करावे, जागरण करावे.
ब्राह्मणभोजन व दक्षिणा द्यावी.
भागवत साप्ताह समाप्ति
११ तारखेला सुरु झालेल्या
भागवत साप्ताहीची समाप्ती होत आहे.
संन्यासिनां चातुर्मास्य समाप्ति
या दिवशी
संन्यासव्रत घेतलेल्यांचा चातुर्मास समाप्त होत आहे. व्यासपूजनाच्या दिवशी याची
सुरवात झाली होती.
अन्वाधान
अग्नी
हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन
कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून
जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ईष्टिच्या
च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.
रविचा कन्या राशीत प्रवेश
१८:३५ ला रवि सिंह राशीत
प्रवेश करीत आहे.
रवि
संक्रमणाच्या वेळी, कन्या राशीसाठी संक्रमणानंतर १६
घटिका पुण्यकाळ असतो. मात्र यामध्ये रात्रीची वेळ घेत नाहीत. पुण्याकालात स्नान,
दान इ. गोष्टी अधिक शुभ मानल्या आहेत. म्हणून पुण्यकाल १२:११ ते १८:३५ असा आहे.
सामुदायिक
मुहूर्त ३० म्हणजे साम्यार्घ आहेत. रविच्या राशी संक्रमाणाच्या
वेळी असणाऱ्या चंद्र नक्षत्रावरून ३ प्रकारचे सामुदायिक मुहूर्त होतात. ते व
त्यांची फळे पुढील प्रमाणे:
·
१५ : महर्घ / जघन्य : फळ = तेजी
·
३० : साम्यार्घ : फळ = सम
·
४५ : समर्घ : फळ = मंदी
भद्रा
१३:५८ पर्यंत भद्रा म्हणजे
विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या
वेळी भागान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या
देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही
गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ
झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा
पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे
दोन्ही पक्षात चर चर वेळा भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ
व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन
व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु
व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे
असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता
ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी
असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा
दोष माणू नये.
योग्य व वर्ज कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग,
अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट
इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ.
कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व
फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.
भद्रा मुख व पृच्छ:
ज्या तिथीत भद्रा असेल त्या
आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. ते अत्यंत अशुभ होय.
तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून
सर्व कार्यास प्रशस्त मानावे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment