Wednesday, 7 September 2016

दिनविशेष - ८ सप्टेंबर – २०१६




तिथी
 भाद्रपद शुक्ल ७ (२८:१९)  
वार
 गुरुवार
नक्षत्र
 अनुराधा (२८:२६)
योग
 वैधृति (११:१२)
करण
 गरज (१५:१३)


गौरी आवाहन

दिवसभर
पुराणात अशी कथा आहे, असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया श्रीमहालक्ष्मी गौरीला शरण गेल्या. त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली. श्रीमहालक्ष्मी गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना आणि पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले; म्हणून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात.

हे व्रत तीन दिवस चालते. प्रांतभेदानुसार हे व्रत करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये धातूची, मातीची प्रतिमा करून अथवा कागदावर श्री महालक्ष्मीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. (महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्‍या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. त्या मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. ही एक रूढी आहे.)

भाद्रपदातील शुक्ल पक्षातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठागौरीचे आवाहन केले जाते.
गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी, ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा करून नैवेद्य दाखवतात.
तिसर्‍या दिवशी, मूळ नक्षत्रावर  गौरीचे नदीत विसर्जन करतात आणि परत येतांना नदीतील थोडी वाळू किंवा माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.

अमुक्ता भरणव्रत

हे व्रत मुख्यत: स्त्रियांसाठी आहे. या दिवशी शिव-पार्वतीच्या चित्राकृती स्थापून त्याच्या पार्श्‍वभागी सोन्यारुप्याच्या तारांचा अथवा सुताचा दोरा वळून ठेवतात. नंतर षोडशोपचार पूजा करतात. पूजेचा मंत्र असा-
मन्दारमालाकुलितलकायै कपालमालाङ्‌कितशेखराय ।
दिव्याम्बरायै च दिग्मबराय नम: शिवायै च नम: शिवाय ॥

अपराजित सप्तमी

भाद्रपद शुक्ल सप्तमीला अपराजिता सप्तमी असे नाव आहे. चतुर्थीला एकभुक्‍त राहून पंचमीला नक्‍त भोजन, षष्ठीला उपवास व सप्तमीला सूर्यपूजा करून मग पारणे, असे त्याचे विधान आहे. आश्‍विनादी, मार्गशीर्षादी फाल्गुनादी व ज्येष्ठादी असे या व्रताचे चार प्रकार असून त्यांच्या देवत अनुक्रमे भर्ग, अंशुमन, अर्यमा व सविता या आहेत. या व्रतात वरील देवतांची पूजा व प्रार्थना करायची असते. हे व्रत आचरणारा युद्धात शत्रूला पराजित करतो व त्रिवर्गावर जय मिळवून सूर्यलोकात जातो, असे सांगितले आहे. व्रतावधी एक वर्ष.

भद्रा

२८:१९ नंतर भद्रा म्हणजे विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भागान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चर चर वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष माणू नये.

योग्य व वर्ज कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.

भद्रा मुख व पृच्छ:
ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. ते अत्यंत अशुभ होय. तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून सर्व कार्यास प्रशस्त मानावे.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment