तिथी
|
भाद्रपद शुक्ल ३ (१८:५५)
|
वार
|
रविवार
|
नक्षत्र
|
हस्त (१६:५३)
|
योग
|
शुभ (७:४८)
|
करण
|
वणिज (--:--)
|
हरितालिका तृतीया
हरतालिका हे व्रत
पार्वतीने शंकर आपल्याला पती म्हणून मिळावा यासाठी केले होते असे मानले जाते.
तेव्हांपासून आपल्याला जोडीदार मनासारखा व चांगला मिळावा म्हणून कुमारिकांनी हे
व्रत करावे असा प्रघात आहे आणि लग्नानंतर मनासारखा जोडीदार मिळाला म्हणून आणि
जन्मोजन्मी असाच जोडीदार मिळावा म्हणून नंतरही स्त्रिया हे व्रत करतात. हरतालिका
या शब्दाची फोड "हरित` म्हणजे "हरण` करणे आणि "आलिका` म्हणजे "आलिच्या`-मैत्रिणीच्या असा आहे. मैत्रिणींच्या
साह्याने पार्वतीने केलेले शंकराचे हरण, असा या शब्दाचा अर्थ आहे. मंगळागौरीच्या
पूजेप्रमाणेच हिरव्या बांगडया २, कंगवा, आरसा, कुंकू, करंडा इ. साहित्य आणून, शंकराची प्रतिमा
म्हणून वाळूची पिंड करून पूजा करतात. सात प्रकारची प्रत्येकी सात सात पाने गोळा
करून ती शंकराला वहातात. त्यापैकी मुख्य पान म्हणजे रूईचे व बेलाचे पान. ही दोन्ही
पाने ह्या पूजेत आवश्यकच आहेत.
पूजा झाल्यावर
हरतालिकेची आरती म्हणतात व कहाणी वाचतात. त्यादिवशी बायका कंदमुळाशिवाय काहीही खात
नाहीत. दिवसभर पाणीसुध्दा पित नाहीत. रात्री बारा वाजता रूईच्या पानावर मध घालून
चाटतात. दुसरे दिवशी आंघोळ करून हरतालिकेची आरती करून उपवास सोडतात. हरतालिकेच्या
दिवशी बायका एकत्र येऊन रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करतात खेळ, फुगडया, गाण्याच्या भेंडया
खेळतात. या दिवशी स्त्रिया इतर स्त्रियांना सौभाग्यवाणे देतात. दुस-या दिवशी
उत्तरपूजा करतात.
स्वर्णगौरी व्रत
हे व्रत पतीचे
आरोग्य व कुटुंब यांचेसाठी केले जाते.
ॐ सर्व मंगल
मांगल्ये
शिवे सर्वार्थ
साधिके !
शरण्ये त्रंबके
गौरी
नारायणी
नमोस्तुते !
या मंत्राने पूजा
केली जाते.
वराह जयंती
वराह अवतार हा
विष्णूच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार मानला जातो. वराह अवतार भाद्रपद शुक्ल तृतीयेस अपराह्नकाळीं झाला. या
दिवशी भगवंताचा जयंती व उत्सव साजरा करावा.
मत्स्य अवतार
|
चैत्र शुक्ल
तृतीया
|
अपराह्नकाळी
|
कूर्म अवतार
|
वैशाख पौर्णिम
|
सायंकाळी
|
वराह अवतार
|
भाद्रपद शुक्ल
तृतीया
|
अपराह्नकाळी
|
नृसिंह अवतार
|
वैशाख शुक्ल
चतुर्दशी
|
सायंकाळीं
|
वामन अवतार
|
भाद्रपद शुक्ल
द्वादशी
|
माध्यान्हकाळी
|
परशुराम अवतार
|
वैशाख शुक्ल
तृतीया
|
माध्यान्हकाळीं
झाला. ( हा प्रदोषकाळी झाला असे
अन्य मत असून सध्या प्रचार ही प्रदोषकाळी मानण्याविषयीच आहे. )
|
राम अवतार
|
चैत्र शुक्ल
नवमी
|
माध्यान्हकाळी
|
कृष्ण अवतार
|
श्रावण कृष्ण
अष्टमी
|
मध्यरात्री
|
बौध्द अवतार
|
अश्विन शुक्ल दशमी
|
सायंकाळी
|
कल्की अवतार
|
श्रावण शुक्ल
षष्ठी
|
सायंकाळी
|
वराह अवतार कथा
ब्रह्मदेवाच्या
नाकाच्या छीद्रातून अचानकपणे अंगठ्या एवढा एक वराह शिशु बाहेर पडला. आश्चर्याची
गोष्ट अशी की आकाशात असलेला तो वराह शिशु ब्रह्मदेवाच्या देखतच मोठा होऊन क्षणातच
हत्तीएवढा झाला. त्यांचे शरिर अत्यंत कठोर होते. त्वचेवर राठ केस होते. पांढरी
दाढी आणि डोळयात तेज होते. स्वत:चा खेद नाहीसा करणारे ते मायामय वराहाचे गुरगुरणे
ऐकून जन, तप व सत्य लोकातील
मुनींनी तीन वेदातील मंत्रांनी त्याचे
स्तवन केले. त्या यज्ञ वराहणे उदका मध्ये प्रवेश केला व पृथ्वीचा माग काढला. त्या
वराह भगवानाच्या उडीने विदीर्ण महासागर भगवानाला शरण गेला. निमग्न झालेली पृथ्वी
स्वत:च्या दाढेने वराहाने वर काढली.हाती गदा घेऊन चालून येणाऱ्या मदमत्त
हिरण्याक्ष दैत्याचा त्याने उद्कामध्येच लीलेने वध केला. शूभ्रदंताग्रावर गजलीलेने
पृथ्वी उचलून धरनाऱ्या व नीलवर्ण असलेल्या त्या वराहाला पाहून ब्रह्मदेवादी देवानी
हात जोडून त्याची स्तोत्रांनी स्तुती केली. ही कथा जो श्रवण करतो तो ब्रह्महत्ये
पासून मुक्त होतो व नारायनाशी त्याला ऐक्य प्राप्त होते.
कोटी संवत्सरव्रत:
भाद्रपद शुक्ल तृतीयेस हे
व्रत करतात. व्रतावधी-चार वर्षे. एक लक्ष तांदूळ किंवा तीळ दुधात घालून वाटतात व
त्या गोळ्याची पार्वतीची मूर्ती बनवतात. त्या दिवशी उपवास करून तिची पूजा करतात.
व्रताचे फल - दारिद्र्यनाश, चांगला पती व चांगली संतती यांचा लाभ व्हावा म्हणुन स्त्रिया हे व्रत करतात.
याला लक्ष्मेश्वरी व्रत असेही म्हणतात.
गिरितनयाव्रत
भाद्रपद किंवा
मार्गशीर्ष शुक्ल तृतीयेस या व्रतास आरंभ करतात. व्रतावधी एक वर्ष. हे व्रत
प्रत्येक महिन्यात निरनिराळ्या नावांनी व फुलांनी गौरीची पूजा करून करतात.
गोपदत्रिरात्र व्रत
व्रतारंभ भाद्रपद
शुक्ल तृतीयेस किंवा चतुर्थीस करतात. हे व्रत सूर्योदयाच्या वेळी करावयाचे असते.
त्याचा विधी-गाय व लक्ष्मीनारायण यांची तीन दिवस पूजा. गाईच्या शिंगांना व शेपटीला
दही व तूप लावणे व उपवास.
'माता रुद्राणाम्'
या मंत्राने
गाईची पूजा करावी. भाद्रपदात व्रतारंभ न करता आल्यास तो कार्तिकात केला तरी चालतो.
सामश्रावणी
या दिवशी सामवेदी ब्राह्मण
त्यांचे जुने जानवे टाकुन नवीन
जानवे धारण करतात.
मन्वादि
१४ मन्वंतराच्या आरंभ
झाल्या अशा १४ तिथीना मन्वादि असे म्हणतात. या मन्वादि १४ तिथी पुढे दिल्या आहेत.
१
|
स्वायंभुव
|
चैत्र शुक्ल तृतीया
|
२
|
स्वारोचीस
|
चैत्र शुक्ल पौर्णिमा
|
३
|
उत्तम
|
कार्तिक शुक्ल पौर्णिमा
|
४
|
तामस
|
आषाढ शुक्ल पौर्णिमा
|
५
|
रैवत
|
कार्तिक शुक्ल द्वादशी.
|
६
|
चाक्षुस
|
आषाढ शुक्ल दशमी.
|
७
|
वैवस्वत
|
ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा.
|
८
|
सावर्णी
|
फाल्गुन शुक्ल पौर्णिमा.
|
९
|
दक्ष सावर्णी
|
आश्विन शुक्ल नवमी.
|
१०
|
ब्रह्म सावर्णी
|
माघ शुक्ल सप्तमी
|
११
|
धर्म सावर्णी
|
पौष शुक्ल एकादशी.
|
१२
|
रुद्र सावर्णी
|
भाद्रपद शुक्ल तृतीया.
|
१३
|
देव / रुची
सावर्णी
|
फाल्गुन शुक्ल अमावस्या.
|
१४
|
इंद्र/ भूती
सावर्णी
|
श्रावण कृष्ण अष्टमी.
|
‘मनु’ बाबत श्रीमद्भ्गव्दगीतेत
म्हटले आहे
महर्षय: सप्त
पूर्वे चत्वारो मनवस्तथा !
मद्भावा मानसा
जाता येषां लोक इमा प्रजा: !!
(श्रीमद्भ्गव्दगीता
अध्याय १०: श्लोक ६ )
अर्थ: श्री कृष्ण
म्हणतात हे अर्जुना सात महर्षी जन आणि
त्यांच्याही पूर्वी झालेले चार सनकादिक तसेच स्वायंभुवादी चौदा मनु हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वंजन माझ्या संकल्पाने उत्पन्न झालेले आहेत आणि जगात
यांच्याच ह्या सर्व प्रजा आहेत.
अमृतयोग
१६:५३ पर्यंत रविवारी हस्त
नक्षत्र असल्यामुळे अमृतसिद्धी योग होत आहे.
हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – हस्त
|
सोमवार – मृग / श्रवण
|
मंगळवार – अश्विनी
|
बुधवार – अनुराधा
|
गुरुवार – पुष्य
|
शुक्रवार – रेवती
|
शनिवार – रोहिणी
|
|
हा सामन्यात:
सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
|
विवाहास वर्ज
|
शनिवार – रोहिणी
|
प्रयाणास वर्ज
|
मंगळवार – अश्विनी
|
गृहप्रवेशास वर्ज
|
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment