तिथी
|
भाद्रपद शुक्ल ११ (७:५७)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
उत्तराषाढा (१०:२४)
|
योग
|
शोभन (१०:१६)
|
करण
|
बव (१९:३५)
|
परिवर्तिनी एकादशी
या दिवशी भगवान
श्री विष्णू आपली कूस बदलतात अशी मान्यता आहे. त्यामुळे या एकादशीला परिवर्तिनी
एकादशी असे नाव आहे.
शुक्लैकादशी / विजया एकादशी
भाद्रपद शुक्ल
पद्मा एकादशीला पहाटे प्रात:स्नानादी कृत्ये झाल्यावर भगवंताची यथाविधी पूजा
करावी. उपवास करून रात्री हरिजागरण करावे व दुसरे दिवशी पूर्वान्ही (सकाळी) पारणे
करावे जर सकाळी श्रवणनक्षत्राच्या मध्याच्या २० घटिका असतील तर भोजन करू नये. तसेच, जर मध्यान्हीच्या पुर्वी श्रवणाचा मध्य अंश नसेल, तर पाणी पिऊन पारणे करावे.
जर या दिवशी
श्रवणनक्षत्र असेल तर या एकादशीला 'विजया एकादशी' म्हणतात. या व्रताने सर्व मनोरथ पूर्ण होतात. या दिवशी 'श्रीवामना'ची पूजा करतात. व्रत करणार्याने त्या दिवशी
सकाळी स्नान झाल्यावर 'श्रीवामना'ची सोन्याची
मूर्ती करून तिची गंधफुलांनी यथाविधी पूजा करावी व त्यावेळी 'मत्स्य, कूर्म, वराह' आदी नामांचा उच्चार करावा. रात्री जागरण करावे. दुसरे दिवशी
असलेले देय द्रव्य ब्राह्मणांना दान देऊन, त्यांना भोजन घालून
नंतर आपण स्वत: जेवावे व व्रताची सांगता करावी.
कटिपरिवर्तनोत्सव
भाद्रपद शुक्ल
एकादशीला भगवंताचा कटिपरिवर्तन ( कूसबदल ) उत्सव करतात. त्या दिवशी 'देवप्रबोधिनी' एकादशीप्रमाणे सर्व विधी करतात. देवाला स्नान, रथयात्रा वगैरेसह समारंभाने आणून सायंकाळी महापुज व नीरांजनांनी
आरती करून रात्री देवास उजव्या कुशीवर निजवावे व जागरण करावे. दुसरे दिवशी सकाळी '
'वासुदेव जगन्नाथ प्राप्तेअयं द्वादशी तव ।
पार्श्वेन
परिवर्तस्व सुखं स्वापिहि माधव ॥'
अशी प्रार्थना
करून पारणे सोडावे. राजपुतान्यात या उत्सवाला' जलझूलनी' असे नाव असून सामान्यपणे अथवा विशेष प्रकाराने हा साजरा
करतात.
कर्मावर्मा
हे व्रत
उत्तरभारतात प्रचलित आहे. हे व्रत भाद्र. शुक्ल एकादशीस सायंकाळी करतात. या दिवशी
बायका आपल्या परसात दोन खळगे करून एकात पाणी व दुसर्यात दूध ओततात. त्या दोन
खळग्यांच्या मध्यभागी कुशतृणाचे रोप लावतात. जितके भाऊ असतील, तितकी कुशाची पाती आपल्या केसात खोचतात. विष्णूची पूजा करून
केवळ फलाहार करतात. दुसर्यादिवशी खळग्यातले दूधपाणी, कुश, निर्माल्य सर्व नदीत नेऊन सोडतात. ब्राह्मणाला शिधा देतात व
व्रताचे पारणे करतात. या व्रतामुळे स्वत:च्या व बंधूंच्या सर्व आपत्ती दूर होतात, अशी समजूत आहे.
वामन जयंती / वामनद्वादशी
भाद्रपद
शुक्लपक्षी श्रवणयुक्त द्वादशीचे दिवशी मध्याह्नकाली वामनाचा अवतार झाला. बळी राजाला पाताळात घालून वामनाने देवांन स्वर्गलोक परत
मिळवून दिला व आपण पाताळात द्वाररक्षक म्हणून राहिला. या दिवशी वामनपूजा करून
पांढरी वस्तू दान द्यावी. याने मोक्ष मिळतो.
मध्याह्नकाली
नदीच्या संगमावर स्नान करून सुवर्णमय वामनाचे प्रतिमेची पूजा करून सुवर्णपात्राने
अर्घ्य द्यावे. पूजेविषयी मंत्र
नमस्ते पद्मनाभाय
नमस्ते जलशायिने ।
तुभ्यमर्घ्यं
प्रयच्छामि बालवामनरूपिणे ॥
नमः
शार्ङधनुर्बाणपाणये वामनाय च ।
यज्ञभुक्फलदात्रे
च वामनाय नमो नमः ॥"
नंतर दुसर्या
दिवशी सपरिवार वामनाची मूर्ति ब्राह्मणाला दान करावी; दानाचा मंत्र-
"वामनः
प्रतिगृह्णाति वामनोहं ददामि ते ।
वामनं
सर्वतोभद्रं द्विजाय प्रतिपादये ॥"
महाद्वादशी
भाद्रपद शुक्ल द्वादशीला
श्रवण नक्षत्र असेल तर तिला महाद्वादशी असे म्हणतात. या दिवशी उपवास आणि विष्णूची
पूजा या गोष्टी करावयाच्या असतात. याच तिथीला बुधवार व श्रवण नक्षत्र असेल तर तिचे
माहात्म्य अधिक आहे. हे व्रत केल्याने महाफल मिळते.
श्रवणोपवास
गुरु लोप
गुरुचा पश्चिम दिशेला लोप
(गुरु अस्त) होत आहे.
ग्रहांचे
सूर्य सानिध्यामुळे अदर्शन होते. यालाच ‘अस्त’ असे म्हणतात. आणि तोच ग्रह
सूर्यापासून ठराविक अंतारावर गेला कि त्याचे दर्शन आपल्याला पूर्वेस अथवा पश्चिमेस
होऊ लागते. त्याला ‘उदय’ असे म्हणतात.
गुरु
हा आकाराने मोठा असा शुभ ग्रह आहे.
गुरु शुभग्रह असल्यामुळे तो
अस्तंगत असताना अनेक शुभ कार्यांना वर्ज असतो.
अस्त होण्यापूर्वी काही
दिवस त्याच्या तेजाच्या वार्धक्याचे व उदयानंतर काही दिवस तेजाच्या बालात्वाचे
म्हणूनही धर्म कार्यात वर्ज सांगितले आहेत.
बालत्व / वृद्धत्व
|
दिशा
|
दिवस
|
बालत्व
|
पूर्वेस उदय
|
१५ / १० / ७ / ५ / ३ दिवस
|
बालत्व
|
पश्चिमेस उदय
|
१५ / १० / ७
|
वृद्धत्व
|
पूर्वेस अस्त
|
१५ / १० / ७
|
वृद्धत्व
|
पश्चिमेस अस्त
|
१५ / १०/ ७ / ५
|
रविचा उत्तराफाल्गुनी नक्षत्र प्रवेश
८:२७ ला रवि उत्तराफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करत आहे. रविचे
मृग नक्षत्र ते हस्त नक्षत्र संक्रमण हा काळ भारतात पावसाळ्याचा मुख्य काळ समाजाला
जातो.
रवि
नक्षत्र : उत्तराफाल्गुनी
चंद्र
नक्षत्र: उत्तराषाढा
वाहन घोडा
रवि
नक्षत्र प्रवेशाच्या वेळी चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे यावरून वाहन ठरते. सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत मोजावे, त्यास ९ ने भागून बाकी किती राहते
त्याप्रमाणे वाहन ठरते.
बाकी
|
वाहन
|
पर्जन्य वृष्टीचे स्वरूप
|
१
|
घोडा
|
पर्वतावर पाऊस पडेल
|
२
|
कोल्हा
|
पाऊस पडणार नाही.
|
३
|
बेडूक
|
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
|
४
|
मेंढा
|
पाऊस पडणार नाही.
|
५
|
मोर
|
अल्पवृष्टी होईल.
|
६
|
उंदीर
|
अल्पवृष्टी होईल.
|
७
|
महिष
|
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
|
८
|
गाढव
|
अल्पवृष्टी होईल.
|
० / ९
|
हत्ती
|
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
|
रवि
नक्षत्र : उत्तराफाल्गुनी
चंद्र
नक्षत्र: उत्तराषाढा
अंतर
: १०
१०
ला ९ ने भागले असता बाकी राहते १. म्हणून वाहन घोडा आहे. याचाच अर्थ रवि उत्तराफाल्गुनी
नक्षत्रात असताना पर्वतावर पर्जन्यवृष्टी होईल.
नक्षत्रसंज्ञा : सू चं
सूर्य नक्षत्रे
|
रोहिणी, मृग, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा,
जेष्ठा, मूळ, धनिष्ठा, शततारका, उत्तराभाद्रपदा
|
चंद्र नक्षत्रे
|
अश्विनी, भरणी, कृत्तिका, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा,
पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, पूर्वा भाद्रपदा, रेवती
|
दोन्ही सूर्य नक्षत्रे
|
वारा सुटेल
|
दोन्ही चंद्र नक्षत्रे
|
पाऊस पडणार नाही
|
एक चंद्र व दुसरे सूर्य
|
पाऊस पडेल
|
रवि
नक्षत्र : उत्तराफाल्गुनी = सूर्य नक्षत्र
चंद्र
नक्षत्र: उत्तराषाढा = चंद्र
नक्षत्र
एक चंद्र व दुसरे सूर्य नक्षत्र आहे. याचा अर्थ रवि उत्तराफाल्गुनी नक्षत्रात असताना चांगला पाऊस
पडेल.
स्त्री-पुरुष-नपुंसक नक्षत्रे : स्त्री, पु
स्त्री नक्षत्रे
|
आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा,
मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती
|
पुरुष नक्षत्रे
|
अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी,
मृग, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा
,उत्तराभाद्रपदा, रेवती
|
नपुंसक नक्षत्रे
|
विशखा, अनुराधा, जेष्ठा
|
सूर्य
नक्षत्र स्त्री संज्ञक व चंद्र नक्षत्र नपुंसक : वारे सुटून वृष्टी मध्यम होईल
स्त्री
पुरुष असा योग असेल तर: वृष्टी समाधान कारक होईल.
रवि
नक्षत्र : उत्तराफाल्गुनी = स्त्री नक्षत्र
चंद्र
नक्षत्र: उत्तराषाढा = पुरुष
नक्षत्र
एक
स्त्री नक्षत्र तर दुसरे पुरुष नक्षत्रआहे. त्यामुळे रवि पुनर्वसु उत्तराफाल्गुनी असताना समाधानकारक पर्जन्यवृष्टी होईल.
पावसाचा
अंदाज घेताना या बरोबरच रविच्याच्या नक्षत्र प्रवेशाची कुंडली मांडून त्यातील ग्रह
स्थिती लक्षात घेणे देखील अत्यावश्यक आहे.
घबाड
७:५७ नंतर ८:२७ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: पूर्वाफाल्गुनी
चंद्र
नक्षत्र : उत्तराषाढा
तिथी: १२
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ११
११
x ३ = ३३
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १२ तिथी मिळवू : ३३ + १२ = ४५
आता
७ ने भागू ४५ / ७ = ६ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
घबाड
१०:२४ नंतर घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: उत्तराफाल्गुनी
चंद्र
नक्षत्र : श्रवण
तिथी: १२
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ११
११
x ३ = ३३
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १२ तिथी मिळवू : ३३ + १२ = ४५
आता
७ ने भागू ४५ / ७ = ६ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
भद्रा
७:५७ पर्यंत भद्रा म्हणजे
विष्टि करण आहे.
उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या
वेळी भागान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या
देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिलाच भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही
गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ
झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.
प्रत्येक चांद्रमासात ८
वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा
पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे
दोन्ही पक्षात चर चर वेळा भद्रा येते.
भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ
व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन
व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु
व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे
असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता
ती अशुभ जाणावी.
अपवाद:
पुर्वार्धी
असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा
दोष माणू नये.
योग्य व वर्ज कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग,
अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट
इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ.
कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व
फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.
भद्रा मुख व पृच्छ:
ज्या तिथीत भद्रा असेल त्या
आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. ते अत्यंत अशुभ होय.
तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून
सर्व कार्यास प्रशस्त मानावे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment